शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला आयआयएम नाकारल्याने मुख्यमंत्र्यांचा निषेध

By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST

औरंगाबाद : उत्तम प्रशासन दिनीच महाराष्ट्र शासनाने अपारदर्शी निर्णय घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर येथे उभारण्याचा निर्णय जाहीर केला.

औरंगाबाद : उत्तम प्रशासन दिनीच महाराष्ट्र शासनाने अपारदर्शी निर्णय घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर येथे उभारण्याचा निर्णय जाहीर केला. औरंगाबाद आणि नागपूर या शहरांचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. केवळ विकासाचे केंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने औरंगाबादला आयआयएम नाकारल्याने आयआयएम मराठवाडा कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला असून, त्याबाबतचे खुले पत्रच त्यांना पाठविण्यात आल्याचे कृती समितीतर्फे मुनीष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शर्मा म्हणाले की, औरंगाबाद शहर हे औद्योगिक विकासात खूप अग्रेसर आहे. डीएमआयसी प्रकल्पामुळे औरंगाबादच्या औद्योगिक विश्वात खूप मोठी भरभराट होणार आहे. त्यामुळे येथेच आयआयएमची गरज आहे. आयआयएम मराठवाडा कृती समितीकडून सहा महिन्यांपासून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची १६ आणि १७ डिसेंबर रोजी भेट घेऊन त्यांना आयआयएमवर औरंगाबादचाच दावा असल्याचे सांगितले होते. यावेळी उच्च शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु तरीही २४ डिसेंबर रोजीच आयआयएम नागपूर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
केवळ विदर्भकेंद्रित निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना खुले पत्र पाठवून त्यांचा निषेध करीत आहोत. तसेच मराठवाड्याच्या विकासाची आपली भूमिका, योजना आणि कृती आराखडा काय आहे हे आठ दिवसांत जाहीर करावा, अन्यथा मोठ्या जनक्षोभाला आणि आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी उद्योजक सुनील किर्दक यांनी दिला. या पत्रकार परिषदेला कृती समितीचे हितेश गुप्ता, नितीन सोमाणी, सुनील किर्दक, अजय शहा उपस्थित होते.