शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पदवीधरची अट रद्द करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:20 IST

बीड : बियाणे- खते, औषधी विक्रीसाठी कृषीची पदवी नुकतीच बंधनकारक केली होती. ही अट अन्यायकारक असल्याचा दावा करुन शिथील करण्याची मागणी कृषी विक्रेत्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

बीड : बियाणे- खते, औषधी विक्रीसाठी कृषीची पदवी नुकतीच बंधनकारक केली होती. ही अट अन्यायकारक असल्याचा दावा करुन शिथील करण्याची मागणी कृषी विक्रेत्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ८० टक्के विके्रत्यांना झळ सोसावी लागणार असून या निर्णयाचा पुर्नविचार कराण्याची मागणी अ. भा. कृषी साहित्य विके्रता संघटनेचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी केली. या निर्णयाने खेड्यात व्यवसाय करणे अवघड होणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध देशपातळीवर संघटना एकत्र येऊन लढा देत आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह, भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन संघटनेने कृषी विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या आहेत. याउपरही पदवीधरची अट रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. कृषी विक्रेत्यांमार्फत पीकविमा योजना राबवली तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचेल असे सांगून मातीपरीक्षणकेंद्र गावोगावी उभारण्याची मागणीही कलंत्री यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विक्रेते संघटना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमोद निनाळ, जगदीश मंत्री व कृषी विक्रेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)