शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांचा काळा बाजार?

By admin | Updated: May 11, 2014 00:37 IST

भास्कर लांडे , हिंगोली जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार्‍या सोयाबीनसाठी २ लाख ६५६ क्विंटल बियाणे लागणार आहे.

भास्कर लांडे , हिंगोली जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार्‍या सोयाबीनसाठी २ लाख ६५६ क्विंटल बियाणे लागणार आहे; परंतु जिल्ह्यात केवळ १ लाख ६५६ क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध आहे. परिणामी ४० हजार क्विंटल बियाणाची कमतरता असल्याने सोयाबीनच्या बियाणांचा यंदा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होण्याची शक्यता आहे. सोयाबीन वगळता अन्य पिकांच्या क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने घट झाल्याचे पहावयास मिळते. मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात क्षेत्र घट झाली. गतवर्षीची पीक पद्धती पाहता यंदा कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले. त्यात कापसाबरोबर तेलवर्गीय आणि अन्नधान्य पिकांच्या क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत नगदी पिकांत पर्याय नसल्यामुळे पिचलेल्या शेतकर्‍यांना सोयाबीनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विक्रमी उत्पादन जरी होत नसले तरी कापसाच्या तुलनेत सोयाबीन परवडणारे पीक म्हणून समोर आले. मर्यादित खर्चात बर्‍यापैैकी उत्पादन आणि दुबार पिकाची हमी नसली तरी शक्यता असते. म्हणून गतवर्षीच्या १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात यंदा ३९ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ कृषी विभागाने प्रस्तावित क्षेत्रात केली. एकूण इतर पिकांपेक्षा यंदा वाढलेले सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. दुसरीकडे ज्वारी २५ वरून १६ हजार १०६, मुगाचे १९ हजार ५०० वरून १३ हजार ७९६, उडीद १३ हजार ५०० वरून १० हजार ४९८ घट झाली आहे. कापसाच्या क्षेत्रात १ लाख २० हजार वरून ९४ हजार ९५८ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. तुरीच्या क्षेत्रात ३ हजाराने घट झाल्याचे पहावयास मिळते. या सर्व पिकांमध्ये झालेली घट सोयाबीनचे क्षेत्र वाढण्यात झाली. परिणामी १ लाख ९१ हजार ७२७ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा अनुमान कृषी विभागाने काढला. जवळपास ६० टक्के क्षेत्रावर होणार्‍या सोयाबीनच्या पेरणीसाठी २ लाख क्विंटलच्यावर सोयाबीनच्या बियाणांची आवश्यकता असते; परंतु यंदा जिल्ह्यात १ लाख ६५६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. उर्वरित ४० हजार क्विंटल बियाणे कोठून आणणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादकांना प्रमाणित कंपन्यांचे बियाणे पेरणीसाठी लागणार असल्याने मागणी अधिक आहे. त्याप्रमाणात पुरवठा झाला नसल्यास बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांत काळाबाजार झाला होता. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन बियाणे उगवले नव्हते. यंदा देखील हीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी खरीप हंगामाच्या आढावा बैैठकीत फ्लाईंग स्कॉडला सक्त तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत; पण प्रतिवर्षीच या सूचना दिल्या जात असतात. मात्र यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान कृषी अधिकारी तसेच फ्लाईंग स्कॉडसमोर आहे. अधिकार्‍यांसमोर आव्हान सोयाबीन वगळता अन्य पिकांच्या क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने घट झाल्याचे दिसत आहे गतवर्षीची पीकपद्धती पाहता यंदा कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून त्यात कापसाबरोबर तेलवर्गीय आणि अन्नधान्य पिकांच्या क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे नगदी पिकांत सोयाबीनचा पर्याय उपलब्ध झाला असून उल्लेखनीय फायदा जरी होत नसला तरी कापसाच्या तुलनेत सोयाबीन परवडणारे पीक ठरले आहे एकूण इतर पिकांपेक्षा यंदा वाढलेले सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून गतवर्षीच्या १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात ३९ हजार हेक्टर क्षेत्राची केली वाढ ज्वारी २५ वरून १६ हजार १०६, मुगाचे १९ हजार ५०० वरून १३ हजार ७९६, उडीद १३ हजार ५०० वरून १० हजार ४९८ हेक्टरवर घट जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे १ लाख ६५६ क्विंटल बियाणे उपलब्ध असून उर्वरित ४० हजार क्विंटल बियाणे कोठून आणणार? हा प्रश्न झाला निर्माण खरीप हंगाम २०१२-१३ २०१४-२०१५ पिके एकूण क्षेत्र बियाणे क्विंटल एकूण क्षेत्र बियाणे क्विंटल सोयाबीन १ लाख ६५ १ लाख २३ १ लाख ९१७ १ लाख ५६५ कापूस १ लाख २० ६०,००० (पॅकेट) ९१ हजार ९५८ २,३८१ तूर ३२,२५० ३,२५० २७, ८९३ २, ३०१ ज्वारी २५,००० १,८७५ १६, १०६ १, ३०७ मूग १९,५०० १९५० १३,७९६ ७५८ किलो उडीद १३,५००१,३५० १०, ४९८ ६२९ किलो