शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ढकल मोर्चा

By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर आदी ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत आंदोलन केले़

उस्मानाबाद : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर आदी ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी दुचाकी ढकलत नेत अनोखे आंदोलन केले़ यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते़कळंब येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली येथील ढोकी नाका येथून या आंदोलनास प्रारंभ झाला़ ही रॅली शिवाजी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गे केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत दुचाकी ढकलत नेण्यात आली़ या आंदोलनात विलास करंजकर, विशाल बारसकर, अनंत घोगरे, तय्यब हाश्मी, सुझानंद वरपे, सुभाष वाघमारे, संजय गरड, समीर बागवान, विजय गायकवाड, बाळासाहेब शेळके, प्रकाश भोसले, पृथ्वीराज देशमुख, दिग्विजय पाटील, बाळू लोकरे, मुनीर पठाण, संजय सोनवणे, प्रशांत घोगरे, रवि पुरी, सागर घोगरे, सुनील पाटील, अनंत बारटक्के, गजानन मुंडे, राहुल वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते़उमरगा येथे राष्ट्रीय महामार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, प्रा़डीक़ेक़ांबळे, तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, नगरसेवक विजय दळगडे, अतिक मुन्शी, सतीश सुरवसे, विजय वाघमारे, राम धोत्रे, सुभाष घोडके, कमलाकर मंमाळे, आयुब जमादार, प्रदीप गिरीबा, महेश माशाळकर, बाळू परांडे, चंद्रशेखर पवार, बंडू पवार, अजय वाघमारे, शिवा मुरमे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मोदी सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेकतुळजापूर : ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली आहे. दरवाढ कमी करण्याऐवजी वाढविली जात आहे. पेट्रोल, डिझेल भाववाढ आणि रेल्वेची भाडेवाढ करुन तर प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप तुळजापूर येथील आंदोलनावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. निवडणुकीपूर्वी मोदींनी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विसर पडू लागला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसोबतच रेल्वे भाडेवाढही मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य नागरीक महागाईच्या कचाट्यात सापडला आहे. ही सर्व दरवाढ आणि भाडेवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सकाळी तुळजापूर शहरातील सावरकर चौकातून काँग्रेसच्या वतीने मोटारसायकल ढकल मोर्चा काढला. हा मोर्चा बसस्थानक चौक, आंबेडकर चौक, भवानी चौक, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ मार्गे नेण्यात आला. मोर्चामध्ये पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. सदस्य धीरज पाटील, सभापती सचिन पाटील, अशोक मगर, भारत कदम, सुनील रोचकरी, राजेंद्र शेंडगे, शांताराम पेंदे, तानाजी जाधव, विनित कोंडो, लखन पेंदे, सीताराम शिंगे, आण्णाप्पा पवार, अविनाश रसाळ, शाहू मगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.