शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद स्थानकावरच रेल्वेत उडाली ठिणगी ?

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याविषयी अनेक तर्क लढविले जात आहेत;



औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याविषयी अनेक तर्क लढविले जात आहेत; परंतु औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून रवाना झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बोगीला भीषण आग लागली. यामुळे औरंगाबाद रेल्वेस्थानकावरच आग लागण्यास सुरुवात झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावर विशेषत: रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या रवाना होताना फोकसच्या मदतीने ब्रेक लायनर जॅम झाल्याने चाकाजवळ ठिणग्या उडत आहेत का, याची पाहणी केली जात असते. असा प्रकार दिसून आल्यावर वेळीच योग्य ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पॅसेंजर गाडीत नेहमी चोरट्यांचा उपद्रव सुरू असतो. त्यामुळे तांत्रिक दोषांपेक्षा आगीच्या घटनेला चोरट्यांची खोडी कारणीभूत असू शकते. शेगडीवर शेंगा भाजण्याचा प्रकार, विडी-सिगारेट बोगीतच फेकण्याचा प्रकार त्यांच्याकडून होऊ शकतो. सर्वसामान्य प्रवासी फटाके, ज्वालाग्रही पदार्थ सोबत नेतात; परंतु तेही सुरक्षितरीत्या नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आगीचे कारण नेमके स्पष्ट होण्यास फॉरेन्सिकच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या घटनेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून ही गाडी रवाना झाल्यानंतर अवघ्या चार कि.मी.च्या अंतरावर बोगीला भीषण आग लागली. त्यामुळे आगीची सुरुवात औरंगाबाद रेल्वेस्थानकावर झाली, अशी शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद स्थानकाहून रवाना झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बर्निंग ट्रेनची ही घटना घडली. तांत्रिक दोषांऐवजी ही घटना कशाने घडली हे महत्त्वाचे आहेच; परंतु त्यापेक्षा तर सदर प्रकारास कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीचा विचार मॉडेल रेल्वेस्थानकावरच आगीची परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू होता, असाही कयास बांधला जात आहे.
देखभाल महत्त्वाची
४रेल्वेगाड्यांची देखभाल, दुरुस्ती महत्त्वाची आहे. त्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. रेल्वेस्थानकावर ब्रेक लायनरमधून ठिणग्या उडत आहेत का ? याची रात्रीच्या वेळी पाहणी केली जाते. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर या रेल्वेची योग्य पद्धतीने पाहणी करण्याची गरज होती, असे रेल्वे प्रवासी सेनेचे राज सोमाणी यांनी म्हटले.