शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही.

 चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. विशेष म्हणजे याच शाळेत पावणेसात लाख रुपयांची विहीर खोदल्याची माहिती बेलथर येथील कार्यकर्ते राजू पाईकराव यांनी माहितीचा अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जातून पुढे आली आहे. त्यामुळे ठक्करबाप्पा योजनेतून ६ लक्ष ८४ हजार रुपयांची खोदलेली विहीर कोठे गेली? असा प्रश्न विचारला जात असून आता शाळेसाठी अधिग्रहण केलेल्या पाण्याच्या रक्कमेसह दहा लाख रुपये खर्च होवूनही शाळा मात्र तहानलेलीच राहिली आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची सोय तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथे आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात आली. या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी सुविधा देण्याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा जाग्यावरच उपलब्ध व्हाव्यात, हाच या मागचा उद्देश आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पाण्यासाठी राजकारण करीत लाखो रुपये घशात घातल्याचेही उघड झाले आहे. बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पाईकराव यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्यासाठी कोणती योजना उपलब्ध आहे, याबाबत माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंतची माहिती विचारली होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल अथवा विहीर उपलब्ध नसल्याचे लेखी दिले. पाणी उपलब्ध नसल्याने पाणी अधिग्रहण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिग्रहणाच्या पाण्यापोटी ३ लाख १३ हजार रुपये दिल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले. विशेष म्हणजे याच शाळेसाठी ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहीर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही माहितीही मिळाली. मात्र प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेल्या १० लाखांची वसूली करावी व गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करीत पाईकराव यांनी बीडीओंना निवेदन दिले आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची तसेच निवासी राहण्यासाठी कळमनुरी तालुक्यातीलच गोटेवाडी येथे असलेल्या पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेला शासनाकडून उपलब्ध होतो मोठ्या प्रमाणात निधी विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून कायमस्वरुपी पाणी उपलब्ध नसल्याचे आले समोर बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंत मागविलेल्या माहिती अधिकारात पाण्यासाठी राजकारण करीत लाखों रुपये घशात घातल्याचेही आले समोर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल वा विहीर उपलब्घ नसल्याचे दिले होते लेखी शाळेने ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहिर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही मिळाली माहिती. प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. याची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेली १० लक्ष रुपयांची वसुली करावी व आरोपींवर दाखल करण्याची मागणी होत आहे मी नुकताच पदभार स्वीकारला असल्यामुळे याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे यापूर्वी येथे असलेल्या ग्रामसेवकाकडून माहिती घेवून त्याबाबत सांगता येईल. - आर.एन. घुगे, ग्रामसेवक, आखाडा बाळापूर