शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आरोग्य विभागाचा आणखी एक घोटाळा, लेखी परीक्षेत नापासांना नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:07 IST

विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : आरोग्य विभाग नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर, या विभागातील अधिकाऱ्यांनी केलेला नोकरभरती घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी थेट परीक्षेत नापास झालेल्या आठ उमेदवारांना नेमणुका दिल्या. नेमणुकांनुसार हे उमेदवार राज्यातील आठ परिमंडळांतर्गत रुग्णालयात रुजू झाले; परंतु आरोग्य विभागाने अचानक त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे समोर आले.

राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीसाठी गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडण्यात आला होता. हा परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर राज्य सरकारला ही परीक्षा रद्द करावी लागली होती. विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या गट पदासाठी लेखी परीक्षेत ४५ टक्के अथवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनाच निवडसूची बनविताना पात्र समजण्यात येईल, असा नियम करण्यात आला होता. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार या भरतीसाठी अनुत्तीर्ण अर्थात अपात्र होते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आरोग्य विभागातील आयुक्त, आरोग्य संचालक, आरोग्य उपसंचालक(शुश्रूषा) मुख्य प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांची समिती होती. या समितीने पात्र उमेदवारांची निवडसूची तयार केली आणि त्यांना राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात नेमणुका दिल्या. ही प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका पदाच्या लेखी परीक्षेत ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या (नापास) आठ उमेदवारांना २७ ऑक्टोबर २०२१ रोजी नेमणुका देण्यात आल्या.

भानगड लक्षात येऊ नये म्हणून आठ उमेदवारांच्या आठ विभागांत नेमणुकामुंबईतील आरोग्य विभागात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांनी हा घोटाळा करताना खबरदारी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नापासांना नोकऱ्या देताना त्यांच्या नेमणुका राज्यातील विविध आठ परिमंडळांतर्गत कार्यरत शासकीय रुग्णालयात केल्या. यापैकी औरंगाबाद परिमंडळातील परभणी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात युवराज शिवाजी पवार यांना, तर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात अमित राजू गायकवाड यांची नेमणूक केली होती.

दोन महिन्यांनंतर सेवेतून बडतर्फअनुत्तीर्ण उमेदवारांना सेवेत घेतल्याचा प्रकार अंगलट येऊ शकतो, अशी कुणकुण समितीला लागली. यानंतर ६ डिसेंबर २०२१ रोजी आरोग्य उपसंचालक (शुश्रूषा) यांनी तडकाफडकी आदेश काढून आठ उमेदवारांना बडतर्फ केले. या उमेदवारांनी आता न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीState Governmentराज्य सरकारAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद