शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आरोग्य विभागाचा आणखी एक घोटाळा, लेखी परीक्षेत नापासांना नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:07 IST

विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : आरोग्य विभाग नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर, या विभागातील अधिकाऱ्यांनी केलेला नोकरभरती घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी थेट परीक्षेत नापास झालेल्या आठ उमेदवारांना नेमणुका दिल्या. नेमणुकांनुसार हे उमेदवार राज्यातील आठ परिमंडळांतर्गत रुग्णालयात रुजू झाले; परंतु आरोग्य विभागाने अचानक त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे समोर आले.

राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीसाठी गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडण्यात आला होता. हा परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर राज्य सरकारला ही परीक्षा रद्द करावी लागली होती. विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या गट पदासाठी लेखी परीक्षेत ४५ टक्के अथवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनाच निवडसूची बनविताना पात्र समजण्यात येईल, असा नियम करण्यात आला होता. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार या भरतीसाठी अनुत्तीर्ण अर्थात अपात्र होते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आरोग्य विभागातील आयुक्त, आरोग्य संचालक, आरोग्य उपसंचालक(शुश्रूषा) मुख्य प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांची समिती होती. या समितीने पात्र उमेदवारांची निवडसूची तयार केली आणि त्यांना राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात नेमणुका दिल्या. ही प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका पदाच्या लेखी परीक्षेत ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या (नापास) आठ उमेदवारांना २७ ऑक्टोबर २०२१ रोजी नेमणुका देण्यात आल्या.

भानगड लक्षात येऊ नये म्हणून आठ उमेदवारांच्या आठ विभागांत नेमणुकामुंबईतील आरोग्य विभागात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांनी हा घोटाळा करताना खबरदारी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नापासांना नोकऱ्या देताना त्यांच्या नेमणुका राज्यातील विविध आठ परिमंडळांतर्गत कार्यरत शासकीय रुग्णालयात केल्या. यापैकी औरंगाबाद परिमंडळातील परभणी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात युवराज शिवाजी पवार यांना, तर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात अमित राजू गायकवाड यांची नेमणूक केली होती.

दोन महिन्यांनंतर सेवेतून बडतर्फअनुत्तीर्ण उमेदवारांना सेवेत घेतल्याचा प्रकार अंगलट येऊ शकतो, अशी कुणकुण समितीला लागली. यानंतर ६ डिसेंबर २०२१ रोजी आरोग्य उपसंचालक (शुश्रूषा) यांनी तडकाफडकी आदेश काढून आठ उमेदवारांना बडतर्फ केले. या उमेदवारांनी आता न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीState Governmentराज्य सरकारAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद