शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

१३ पैकी ५ डॉक्टरच हजर

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

किनवट : गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉक्टरांपैकी मोजकेच डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांना सेवा देत असल्याने डॉक्टरांच्या वाढलेल्या दांड्यांची तक्रार

किनवट : गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉक्टरांपैकी मोजकेच डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांना सेवा देत असल्याने डॉक्टरांच्या वाढलेल्या दांड्यांची तक्रार आपण आरोग्यमंत्र्यांकडेच करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिली. ७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता दिलेल्या भेटीत मस्टरवरील तेरा पैकी केवळ पाचच डॉक्टर हजर होते.जिल्ह्यापासून दीडशे कि.मी. अंतरावर किनवट आदिवासी तालुक्यात गोकुंदा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित आहे. स्व. खा. उत्तमराव राठोड यांच्या संकल्पनेतून हे रुग्णालय येथे निर्माण झाले. मात्र रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत.७ जून रोजी मनोहर खिसले या सामाजिक कार्यकर्त्याने दवाखान्यात डॉक्टरच नाहीत. रुग्णांची हेळसांड पाहून नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांना या विषयीची माहिती दिली. त्यांनी गोकुंदाचे उपसरपंच प्रवीण मॅकलवार यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले तेव्हा मस्टरवर असलेल्या १३ डॉक्टरपैकी केवळ पाचच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती प्रकाश राठोड यांनी देत जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या डॉक्टरांची तक्रार आ. प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांकडे करुन कार्यवाहीची मागणी करु, असे राठोड यांनी सांगितले.दरम्यान, गैरहजर डॉक्टरांबाबत विचारले असता डॉ. डी. जे. राठोड हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर इतरत्र आहेत. डॉ. मालेटवार व डॉ. मडावी हे सतत गैरहजर आहेत तर डॉ. एस.जी. पल्लेवाड, डॉ. मसारे व डॉ. वाघमारे हे तिघे आज गैरहजर होते. डॉ. एम.एन. राठोड, डॉ. पोहरे, डॉ. आर.एस. लोंढे व डॉ. भागवत हे चार वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत. डॉ. धुमाळे यांनी डीएमओची रातपाळी ड्युटी केली तर वैद्यकीय अधीक्षक चौकशीकामी माहूरला गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दवाखान्याच्या वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नाहीत. मस्टरवर नावे असणारे डॉक्टराचा आकडा मोठा असला तरी दररोज चार- पाचच डॉक्टर हजर असतात. कधी कधी तर डॉक्टरच नसतात? अशा तक्रारी आहेत. सध्या उन्हाळा असल्याने तापाच्या आजारात वाढ झाली. मलेरिया पॉझिटिव्ह रुग्णही आढळले. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्ष राहायला हवे असताना पूर्णच्या पूर्ण डॉक्टर ओपीडीच्या वेळात हजर राहत नसल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्याची ओरड रुग्ण व त्यांचे नातेवाईक करतात. परिचारिकेचा अभाव असून रुग्णकल्याण समितीस बजेट नाही. त्यामुळे एका डॉक्टराचा पगार तीन महिन्यांपासून रखडला आहे तर डिझेललाही पैसे नसल्याने रेफर व्हावे लागणाऱ्या बीपीएलच्या रुग्णांनाही डिझेलसाठी पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप आहे. आदिवासी तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी नियुक्त डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर न करता कर्तव्य बजवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)विद्युत रोहित्रातील तार केली लंपासकिनवट : तालुक्यातील सोमठाणा शिवारातील विद्युत रोहित्रातील ३२ हजार रुपयांची तार लांबविण्यात आल्याची घटना ५ जून रोजी मध्यरात्री घडली. सोमठाणा शिवारात २५ के.व्ही. क्षमतेचे रोहित्र आहे. या रोहित्रातील ३२ हजार रुपयांची तांब्याची तार लांबविण्यात आली. चोरट्यांनी विद्युत रोहित्र खाली पाडून त्याची नासधूस करुन त्यातील आॅईल सांडून टाकले. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता विनायक दिग्रसकर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनीे याप्रकरणीे गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)जि.प. उपाध्यक्षांनी दिली भेट७ जून रोजी मनोहर खिसले या सामाजिक कार्यकर्त्याने दवाखान्यात डॉक्टरच नाहीत. रुग्णांची हेळसांड पाहून नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांना या विषयीची माहिती दिली. त्यांनी गोकुंदाचे उपसरपंच प्रवीण मॅकलवार यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले तेव्हा मस्टरवर असलेल्या १३ डॉक्टरपैकी केवळ पाचच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती प्रकाश राठोड यांनी देत जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या डॉक्टरांची तक्रार आ. प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांकडे करुन कार्यवाहीची मागणी करु, असे राठोड यांनी सांगितले.