शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

२ महिन्यांत २२ तास वीजपुरवठा खंडित!

By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आज पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाले होते.

औरंगाबाद : महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आज पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाले होते. मागील दोन महिन्यांत अंदाजे २२ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पालिकेला पंप बेअरिंग, जलवाहिन्या गळत्यांच्या दुरस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला आहे. महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्यामुळे हा भुर्दंड पालिकेला बसला आहे, तर नागरिकांना ऐन कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागली आहे. आज रविवारी अनेक भागांना कमी दाबाने पाणी आले. आज बहुतांश वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा झाल्याचा दावा मनपाने केला. वीज गेल्यास काय होते? जायकवाडी येथील पम्पिंग सुरू असताना अचानक वीज गेल्यास पंप स्ट्रेप होऊन बंद पडतात. त्यामुळे काही पार्ट खराब होण्याची शक्यता असते. तसेच जलवाहिनीतून प्रेशरने पाणीपुरवठा सुरू असतो, तो अचानक बंद पडल्यामुळे जलवाहिन्यांना गळती लागते. याच कारणामुळे फारोळ्यातील जलवाहिनीला २ फुटांचे भगदाड पडले होते, असे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ यांनी सांगितले. चार दिवस वीज गुल गेल्या आठवड्यात चार दिवस वीज गुल झाली. शनिवारी मध्यरात्रीनंतर ३ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे १,४०० मि.मी. आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा बंद होता. चार दिवसांपासून विजेचा लपंडाव होत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. २२ मे रोजी रात्री १० वाजता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. २३ मे रोजी दुपारी २.३५ ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत फारोळा जुन्या व नवीन पंपाची वीज गेली. फारोळा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. २४ मे रोजी ३ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी महावितरणला पत्र उद्या सोमवारी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना भेटून अखंड पुरवठ्याच्या मागणीसाठी पत्र देण्यात येणार आहे, असे उपअभियंता शिरसाठ यांनी सांगितले. काही सबस्टेशनवरील यंत्रणेची दुरुस्ती करायची असल्यास ती करून घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी महावितरणने अखंड वीजपुरवठा द्यावा. जेणेकरून पालिकेला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी मनपा महावितरणकडे करणार आहे.