शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१९९८ जणांना घरकुले मंजूर

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आजही हजारो कुटुंबिय कच्चा घरामध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आजही हजारो कुटुंबिय कच्चा घरामध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. रमाई आणि इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्हाभरातील १९९८ लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळणार आहे. या घरकुलांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी लांबलचक आहे. २६ हजार २५३ जणांना हक्काच्या घरकुलाची प्रतीक्षा आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये यापैकी १ हजार २७६ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २०५, तुळजापूर १९७, उमरगा १६९, लोहारा ७५, कळंब २४२, वाशी ७५, भूूम १५३ तर परंडा तालुक्यातील १६० जणांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना प्रत्येकी ९५ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर लाभार्थ्यांस स्ववाटा म्हणून ५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. रमाई आवास योजनेंतर्गतही ‘लाभार्थ्यांची संख्या फारशी नाही. कारण या योजनेंतर्गत एका घरकुलासाठी केवळ ७० हजार रुपये दिले जात आहेत. बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे या तोगड्या निधीमुळे घरकुलाचे काम होत नाही. परिणामी घरकुलांची कामे एकेक, दोन-दोन वर्ष रखडली जात आहेत. असे असतानाही २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरातील ७२२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २१६, तुळजापूर २२५, उमरगा ४७, लोहारा ४७, कळंब ५०, वाशी ६९, भूम ३९ आणि परंडा तालुक्यातील २९ लाभार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) इंदिरा आवास योजनेंतर्गतच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. २५ हजारावर लाभार्थ्यांना पक्क्या निवाऱ्याची प्रतीक्षा आहे. मात्र उपलब्ध होत असलेल्या निधीचा विचार केला असता, प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना आणखी काही वर्ष प्रतिक्षेतच रहावे लागणार आहे. २०१४-१५ मध्ये २६ हजार २५३ पैकी १ हजार २७४ जणांनाच घरकुले मंजूर झाली आहेत.