शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१७७ प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला !

By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे.

उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे. त्यामुळे आणखी पावसाची गरज व्यक्त होत आहे.मागील दोन वर्षामध्ये पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाली. त्यामुळे विहिरी, विंधन विहिर आदी स्त्रोतांची पाणीपातळीही झपाट्याने खालवली. अर्धाअधिक पावसाळा कोरडा गेल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या सुरूवातीला जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तलवात कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघू व साठवण तलाव आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी केवळ एक प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. अन्य एका प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक साठा आहे. दोन प्रकल्पांत ५१ ते ५७ टक्के पाणीसाठा झाला असून अतर दोन प्रकल्पांमध्ये सध्या २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. सहा प्रकल्पांत २५ टक्के पेक्षा कमी, चार प्रकल्प जोत्याच्याखाली असून एक प्रकल्प कोरडाच आहे. जिल्ह्यात १९३ लघू प्रकल्प असून, यातील २० प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा असून तेरा प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के साठा आहे. तेरा प्रकल्पांत २६ ते ५० टक्के पाणी साचले आहे. ४५ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. असे असले तरी आजही ६५ प्रकल्प जोत्याखाली असून उर्वरित ३३ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे असे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा, मध्य प्रकल्पामध्ये कळंब तालुक्यातील रायगव्हाण तलाव कोरडा आहे. तसेच ढोकी, कोलेगाव करजखेडा, खामसवाडी, घुगी, येवती, टाकळी, केशेगाव, जाग्जी, बेंबळी, गोपाळवाडी, पाडोळी (आ),बोरगांव राजे, धुत्ता, कोंड, पेंठसागवी, सरोडी, जेवळी, माळेगाव, शिराढोण, ढोराळा, आडसूळवाडी, नागुलगांव, बारातेवाडी, येडेश्र्वरी, गिरलगाव, घुलेवाडी, डुककरवाडी, उमाचीवाडी, जांब या लघू प्रकल्पामध्ये अजिबात पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.