शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
4
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
5
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
6
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
7
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
8
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
9
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
10
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
11
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
12
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
13
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
14
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
15
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
16
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
17
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
18
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
19
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
20
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
Daily Top 2Weekly Top 5

१६८९ शाळांत घेणार स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: October 1, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : शासनाच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिशन स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात


उस्मानाबाद : शासनाच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिशन स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २ आॅक्टोबर रोजी ६२२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा, १६८९ शाळा आणि १९०४ अंगणवाड्यांत स्वच्छतेची शपथ व दहा कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकाम व वापर करण्याबाबत माहिती देण्यावर अधिक भर राहणार आहे. यासाठी प्रत्यक्ष भेटी, स्वच्छता फेरी, विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, संस्थास्तरावरील स्वच्छता सुविधा, किशोरवयीन मुलींची स्वच्छताविषयी बैठक, ात धुवा दिन साजरा करणे आदी उपक्रमांसोबतच अभियान कालावधीत शौचालय बांधलेल्या कुटुंबांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी कळविले आहे.
स्वच्छता कार्यक्रमात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या एक लाख कुटुंबापर्यंत कुटूंब संपर्क अभियानाच्या माध्यमातून पोहोंचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात जिल्हा कक्षातील सल्लागार, विस्ताराधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्ती आदींमार्फत दररोज पंधरा-वीस याप्रमाणे गृहभेटी देण्यात येणार आहेत. यादरम्यान कुटुंबियांकडून स्वच्छता संवाद पत्र भरून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)