शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात आढळले १४७ ‘मुन्नाभाई’

By admin | Updated: December 23, 2014 00:24 IST

औरंगाबाद : आजही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात शासन आणि नोंदणीकृत खाजगी डॉक्टर कमी पडले आहेत.


औरंगाबाद : आजही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात शासन आणि नोंदणीकृत खाजगी डॉक्टर कमी पडले आहेत. परिणामी कोणत्याही वैद्यकीय शाखेची अधिकृत पदवी नसलेले सुमारे १४७ ‘मुन्नाभाई’ औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही मंडळी खेड्यापाड्यांसह औरंगाबादेतही स्वत:चे दवाखाने उघडून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळत आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात वैद्यकीय, होमिओपॅथी आणि आयुर्वेद, युनानी यापैकी कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांशिवाय अन्य सर्व प्रकारच्या डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हणून ओळखले जाते. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना आपल्या क्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात १४७ बोगस डॉक्टर बिनधास्तपणे दवाखाने उघडून रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. या बोगस डॉक्टरांची माहिती नुकतीच आरोग्य विभागाने जमा केली आहे. महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेल्या डॉक्टरांनाच वैद्यकीय व्यवसायाची परवानगी दिलेली आहे.
एका महिन्यात कारवाईचे आदेश
बोगस डॉक्टरांविषयी अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आज झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाने चार बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केल्याचे सांगितले. मात्र, उर्वरित सर्व बोगस डॉक्टरांचे दवाखाने कायमस्वरूपी बंद करावेत आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई एक महिन्यात करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीची बैठक दर तीन महिन्यांतून एकदा होत असते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५४ बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. पैठण तालुक्यात ३१, कन्नड २४, औरंगाबाद ९, खुलताबाद १६ आणि फुलंब्री तालुक्यात १० तर सोयगावमध्ये एक बोगस डॉक्टर असल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. त्यापैकी केवळ चार डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आली.
बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशातून आणल्या पदव्या
४यापैकी बहुतेक जणांच्या पदव्या एसएससी, बीईएमएस, आरएमपी, डीएनएमएस, पीएमपी, बीईएमएस-एन.डी, बीईएमएस-ईएचआर, डीएनएमएस, आययू,डीसीए, सीसीवायएन, बीआयएएनएस, डीईएफएम अशा आहेत. विशेष म्हणजे या पदव्यांचे फुलफॉर्मही या डॉक्टरांना सांगता येत नाहीत. या पदव्या त्यांनी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांतून मिळविल्याचे समोर आले आहे.