शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

११४ गावांना दोन महिन्यांची डेडलाईन

By admin | Updated: August 20, 2014 01:51 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११४ गावांनी दोन महिन्यात आपले गाव १०० टक्के पाणंदमुक्त करावे, अन्यथा संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी दिला.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी निर्मल भारत अभियानांतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांसाठी आयोजित उद्बोधन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. शितलकुमार मुकणे, हनुमंत गादगे, शोभा टेकाळे, भिसे, गिरी, भाले, तोपरसे यांच्यासह जिल्ह्यातील गट समन्वयक व समुह समन्वयक यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना रावत म्हणाल्या की, बेस लाईन डाटा एंट्रीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यामध्ये ३३ व्या क्रमांकावर होता. परंतु, या आठवड्यात राज्यात ५ व्या क्रमांकावर आल्याने त्यांनी ग्रामसेवक व निर्मल भारतच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच ३१ आॅगस्टपर्यंत संबंधित ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने १०० टक्के गाव हगणदारीमुक्त बनविण्याचा मुदत आराखडा तयार करावयाचा आहे. व दोन महिन्यात गाव हगणदारीमुक्त बनवून निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्तावित करावयाचे आहे. अन्यथा सरपंचावर अपात्रतेचा ठराव व ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी रावत यांनी दिला. निर्मल भारत अभियानात संपूर्ण जिल्हा निर्मल करण्याचाही निर्धार यावेळी बोलून दाखविला. तसेच पंतप्रधान यांनी स्वातंत्र्यदिनी हगणदारी मुक्त भारत बनविण्याचा संकल्प बोलून दाखविल्याचे यावेळी संबंधितांना सांगितले. तसेच शौचालय बनविण्याची गती वाढविण्याच्याही सूचना सरपंच, ग्रामसेवक व भारती निर्माण अभियानच्या कर्मचाऱ्यांना दिल्या.