शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

थंडबस्त्यात असलेला चौपदरी महामार्गाचे काम मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST

सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली ...

सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. २०१९ मध्ये भूमिपूजनानंतर थंडबस्त्यात असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर भेटीत समस्या मांडली व याची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेत प्रकल्प सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले.

त्यामुळे अंदाजे एक हजार ९०० कोटी प्रस्तावित किंमत असलेल्या या चौपदरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले आहे. याबाबत गॅझेट नोटिफिकेशन ३१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाले. यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवित झालेली आहे.

या प्रकल्पाबाबत जमीन भुअर्जन करण्यासाठी व इतर समस्या मार्गी काढण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्ताकडे ३ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता.

चंद्रपूर-बल्लारशा-राजुरा-लक्कडकोट ते तेलंगणा राज्य सीमेपर्यंत असलेला चारपदरी महामार्ग क्र. ९३०-डी या महामार्गाचे बामणी - लक्कडकोट ते राज्य सीमेपर्यंत अंदाजे ३३ किलोमीटर लांबीचा रस्ता व बामणी ते कोरपना आदिलाबाद सीमेपर्यंत जुळणाऱ्या ५६ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी अंदाजे एक हजार ९०० कोटी खर्च येणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन महामार्गाचे भूमिपूजनही बामणी येथे करण्यात आले होते. त्यानंतर बामनी ते आष्टी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली व ते काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, बामणी ते लक्कडकोट व बामणी ते कोरपना आदिलाबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला होता. या महामार्गाच्या कामाचा प्राधान्यक्रमही बदलण्यात आलेला होता.

हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे व आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. मात्र, आता या मार्गाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा महामार्ग पूर्णत्वास आल्यास राजुरा, कोरपना व गडचांदूर शहरासोबत महामार्गालगतच्या गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो.