शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST

सिंचन सुविधा उपलब्ध करा पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते दुबार पिकांपासून वंचित आहेत. ...

सिंचन सुविधा उपलब्ध करा

पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते दुबार पिकांपासून वंचित आहेत. त्यामुळे तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादनासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी मोठे नुकसान झाले आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य

वरोरा : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

माकडांमुळे कवेलूंचे नुकसान

राजुरा : ग्रामीण भागात आजही कवेलूची घरे बघायला मिळतात. मात्र मागील काही दिवसापासून तालुक्यातील काही गावांमध्ये माकडांना हैदोस घातला असून कवेलूच्या घरांचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

खताच्या ढिगाऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या दाताळा, कोसारा, देवाळा आदी गावातील रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. वादळवारा आल्यास केरकचरा रस्त्यावर येतो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ढिगारे हटविण्याची मागणी केली जात आहे.

उघड्या जनित्रामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, पोंभुर्णा आदी तालुक्यातील काही गावामध्ये विद्युत वाहिनीच्या जनित्राचे दार उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. याकडे विभागाने लक्ष देऊन जनित्राचे दार बंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे.

ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र

चंद्रपूर : शहरातील बहुतांश वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने यामध्ये कचरा टाकला जात आहे. महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

शौचालयाचा गैरवापर

चंद्रपूर : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.