शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगावर १० कोटी खर्च

By admin | Updated: February 3, 2016 00:51 IST

‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते.

जिल्ह्यात चिमूरची आघाडी : वर्षभरात ३ लाख ५३ हजार मनुष्य दिवसांची निर्मितीराजकुमार चुनारकर खडसंगी‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते. आता शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ६० टक्के मजूर व ४० टक्के मशनरी असे गुणोत्तर ठरविले असल्याने अनेकांच्या हाताला कामे मिळाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असली तरी चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये नऊ कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च झाला असून बऱ्यापैकी हाताला रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात या कामात चिमूर तालुक्याने आघाडी घेतली आहे.देशातील बेरोजगारीवर ठोस उतारा म्हणून तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. मात्र यातील गुणोत्तरात ग्रामसेवकासह अभियंता प्रवर्गातील अधिकाऱ्यांनीही कुशल - अकुशलमध्ये फेरफार दाखविल्याचे चित्र दिसून आले आहे. ६०-४० च्या गुणोत्तरांमध्ये अनेक योजनांमधील तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकारावर अंकूश बसलेला आहे.यात दुर्दैव असे की वाढत्या महागईतही रोजगार हमी योजनेच्या मजुरांना फक्त १६८ रुपये मजुरी देण्याचीच परंपरा केंद्र सरकारने कायम राखलेली आहे. मागील वर्षी काही भागात दुष्काळ असला तरी या योजनेचा कोणी प्रखरतेने वाली नसल्याचेही काही ग्रामपंचायतीमध्ये जाणवत आहे.यावर्षीपासून अकुशलपोटी मजुरावर जास्त खर्च करण्याची मर्यादा पाळल्याने काही गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कृपेने चांगली मजुरी मिळालेली आहे. मागील वर्षात अकुशलवर ६ कोटी ४५ लाख तर कुशल बाबीवर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रोजगार हमी योजना कार्यालयातून देण्यात आली. चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षात मनरेगावर ९ कोटी ९५ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये तीन लाख ५३ हजार मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे दहा हजार मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन सांगण्यात येत आहे. ९ कोटी ९५ लाखांच्या कामात अकुशल कामावर ६ कोटी ४५ लाख तर कुशलवर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च करीत हजारो मजुरांना रोजगार मिळाला असून यामध्ये अनेक गावात पांदन रस्ते, शेततळे, विहिरी ही कामे झाली आहेत.गुणोत्तर प्रमाण ठेवूनच यंदा झाला खर्चमागील वर्षाअगोदर सरसकट खर्च करण्याच्या नादात व ग्रामसेवक, अभियंता वर्गातील अधिकाऱ्यांमुळे रोजगार हमी योजनेचे गुणोत्तर बिघडले होते. त्याचाच फटका हजारो इच्छुक लाभार्थ्यांना बसला होता. मात्र मागील वर्षी प्रशासकीय खर्चापोटी ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी खर्चुन हे गुणोत्तर पाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनाने पूर्ण केले आहे. यदा ६०:४० (अकुशल, कुशल) या गुणोत्तराने हे कामे करण्यात आली आहेत.सन २०१५-१६ मध्ये १० कोटी रुपयांचा निधी मनरेगा अंतर्गत खर्च करण्यात आला. त्यामध्ये अंदाजे दहा हजार मजुरांना रोजगार देण्यात आला. जूनअखेरपर्यंत या वर्षात १५ कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत मनरेगामधून शेततळे, सिंचन विहीर, तलाव खोलीकरण यासारखी कामे करण्यात येणार आहेत.- मिलिंद कुरसंगे, विस्तार अधिकारी (मनरेगा) पं.स. चिमूर