शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी पुन्हा ९९ पाणवठे केले सज्ज

By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST

उत्तर चंद्रपूर वनविभागातील तीनही विभागात वनसंरक्षणासोबतच वन्यजीव संरक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे

चंद्रपूर : उत्तर चंद्रपूर वनविभागातील तीनही विभागात वनसंरक्षणासोबतच वन्यजीव संरक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे वनविभाग खडबडून जागे झाले असून वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नैसर्गिक व कृत्रीम ९९ पाणवठे तयार करण्यात आले आहे.पावसाने दडी मारल्यामुळे राज्याच्या काही भागात पाणी टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाली असली तरी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नैसर्गिक पाणवठे आहेत. काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहे. उन्हाळ्याचे दिवसात कृत्रीम पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच काही पाणवठ्यांचे खोलीकरण सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी या प्रदेशातील विभागाचे जंगलात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. उत्तर चंद्रपूर प्रदेशात ६३ नैसर्गिक व ३६ कृत्रीम असे एकूण ९९ पाणवठे आहेत. त्यापैकी ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभागात ९ नैसर्गिक व १७ कृत्रीम असे एकूण २६ पाणवठे, मध्य चांदा वनप्रकल्प विभागात २९ नैसर्गिक व १४ कृत्रीम असे एकूण ४३ पाणवठे व पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागात २५ नैसर्गिक व ५ कृत्रीम असे एकूण ३० पाणवठे आहेत.वनविकास महामंडळाची निर्मिती निकृष्ट दर्जाच्या वनाचे रुपांतर उत्कृष्ठ दर्जाच्या वनामध्ये करण्याकरिता २५ आॅक्टोबर १९७४ रोजी झालेली आहे. त्या धोरणानुसार वनविकास महामंडळाने अनेक क्षेत्रात उत्पादक वने तयार केलेली आहे व मानवनिर्मित उत्पादक सागाची वने तयार झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र वनविकास महामंडळाला हस्तांतर करण्याची कोणतीही कार्यवाही चालू नाही अथवा प्रस्तावित नाही, असे उत्तर चंद्रपूर वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी कळविलेले आहे.वनविकास महामंडळाद्वारे १९८७ नंतर साफ तोड बंद करण्यात आलेली असून केंद्र शासनाने तांत्रिक दृष्ट्या मान्यता प्राप्त क्षेत्रात ओव्हरवूड रिमूव्हल करून रोपवन घेण्यात येते. त्यात प्रति हेक्टरी ४० वनौषधी फळझाडे राखीव ठेवण्यात येते व सेक्शन लाईन क्षेत्र वगळण्यात येते. (शहर प्रतिनिधी)