शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पळसगावची नळ योजना वादात अडकडली

By admin | Updated: July 30, 2014 23:56 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे.

वासेरा : भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत मौजा पळसगाव येथे ६८ लाख रुपयांची योजना पाच वर्षापूर्वी मंजूर झाली. पाच वर्षापासून सदर योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत नळ योजनेची पाण्याची टाकी बांधकाम, विहीर, विद्युत पंप लाईन व गावापर्यंत पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. सदर कामावर देखरेख ठेवण्याकरिता गावात पाणी पुरवठा समितीची निर्मिती करण्यात आली. समितीच्या ठरावाला महत्त असून आर्थिक व्यवहाराचे अधिकार असून समितीला आहे. असे असतानाही या कामात समिती कुचकामी ठरत असल्याची गावात ओरड आहे.पळसगाव गावाची लोकसंख्या अडीच हजार असून गावात उन्हाळ्यात तिव्र पाणी टंचाई निर्माण होत असते. पाणी टंचाईचा विचार करता मागील पाच वर्षापासून सदर पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. पाच वर्षापासून काम रेंगाळत आहे. सदर कामाचे जुनेच अंदाजपत्रक असल्याने वाढीव अंदाजपत्रक मंजूर करणे आवश्यक आहे. कंत्राटदार, समिती व अभियंता एकमेकांना उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारुन नेत आहेत. वाढीव अंदाजपत्रक मंजूर करण्याकरिता अभियंत्याने स्वत:ची स्वाक्षरी न करता अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटदार अभियंत्याकडे बोट दाखवून उर्वरित काम करण्यास टाळाटाळ करीत आहे तर समिती आम्ही सर्व ठराव दिल्याची माहिती गावकऱ्यांना देत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर गजभिये यांनी संबंधित अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी समितीने वाढीव ठराव दिलाच नसल्याचे स्पष्ट केले.संबंधित अभियंत्यांनी महिन्यात पळसगाव येथे येऊन गावकऱ्यांना लवकर पाणी देऊ, असे आश्वासन दिले. परंतु जुलै महिना होऊनही गावाला अजून पाणी मिळाले नाही. अजूनपर्यंत गावातील पाईपलाईन पूर्ण झालेली नाही तर पाणी कुठून मिळणार, असा प्रश्न निर्माण झला आहे. संबंधित अभियंत्यांनी स्वत:ची स्वाक्षरी न करता वरिष्ठ पातळीवर वाढीव अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गावात वेगवेगळ्या चर्चेला पेव फूटला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावकऱ्याकरिता पाणी पुरवठा योजना सुरू करावी व पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)