शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांच्या शोधात गुंतले गैरआदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : ताब्यात असलेल्या वन जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी जबरानजोतधारकांनी अर्ज दिले. मात्र, तीन पिढ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी : ताब्यात असलेल्या वन जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी जबरानजोतधारकांनी अर्ज दिले. मात्र, तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याने अनेकांचे दावे नामंजूर करण्यात आले आहेत. तीन पिढ्यांचा रहिवासी दाखला आणायचा कुठून, या विवंचनेत जबरानजोतधारक शेतकरी आहेत.

ज्या जमिनीवरच जगणे-मरणे आहे, ती जमीन सोडावी लागणार या विचाराने अनेक कुटुंब हादरली आहेत. वन विभागाच्या पडीक जमिनीत घाम गाळून पूर्वजांनी जमीन सुपीक केली. ओसाड जमिनीत शेती फुलवली. ही जमीनच अनेक कुटुंबांचा जगण्याचा आधार ठरली आहे. आता मात्र आपल्या आजोबा, वडिलांनी मोठ्या कष्टाने कसलेली ही जमीन परत जाणार, ही चिंता जबरानजोतधारक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वन जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून शेकडो गैरआदिवासी जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले होते. मात्र, सादर केलेल्या अर्जासोबत तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याने उपविभागीयस्तरीय वनहक्क समिती, गोंडपिपरी यांच्या दिनांक २८ जुलै २०१०च्या सभेत हे दावे नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे ३१ मे २०१८ रोजी दावा मंजूर करण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने ९ जुलै २०१९ रोजी विनंती अर्ज सादर केलेल्या जबरानजोतधारकांना नोटीस पाठवून लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले. दिनांक ३१ जुलै २०१९ला समितीने लेखी जबाब नोंदवले. २१ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या सभेत गैरआदिवासी जबरानजोतधारकांनी तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याचे कारण पुढे करून अनेक दावे नामंजूर करण्यात आले. दावा नामंजूर झाल्याचे पत्र जबरानजोतधारक शेतकऱ्यांच्या घरी धडकले असून, या पत्रांनी शेतकऱ्यांची घालमेल वाढवली आहे.

पुरावा आणायचा कुठून ?

तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा शोधण्यासाठी जबरानजोतधारक शेतकरी शासकीय कार्यालये पालथी घालत आहेत. मात्र, पुरावा काही केल्या सापडेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेकडो जबरानजोतधारकांची जमीन संकटात सापडली आहे.

माझ्यासारख्या शेकडो कुटुंबांचा जगण्याचा आधार ही आजोबा, वडिलांनी उभी केलेली शेतजमीन आहे. ही जमीन गेल्यास शेकडो कुटुंब रस्तावर येतील. शासनाने याचा फेरविचार करावा व जमिनीचे दावे मंजूर करून उद्ध्वस्त होणारे संसार सावरावे.

- राजू बोरकर, जबरानजोतधारक शेतकरी, बेघर (धाबा).