शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकंपनीने दिले रेल्वे विभागाला पत्र : १ डिसेंबरपासून रेल्वे बंद ठेवणार ?

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.१९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी कमी होऊ लागली. सुरूवातीला १९५२ रोजी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी संसदेत करण्यात आली होती. त्यानंतर १९८२-८३ रोजी या मागणीचा पुनरूच्चार झाला होता. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. मात्र या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.मार्गासाठी ७०८ कोटी ११ लाखांचा खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलणार आहे. राज्य सरकारने तशी कबुलीही दिली. या क्षेत्राचे खासदार नेते यांनी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना पण या रेल्वे मार्गासाठी संबंधित विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपणीने येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती आहे. हे गृहित धरूनच १९१३ पासून अव्याहत धावणारी ही नॅरोगेज रेल्वे गाडी बंद होणार असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कालखंडापासून सुरू असलेल्या या रेल्वेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली. परंतु, प्रवाशांची संख्या वाढल्याने काळानुसार निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. नॅरोगेज झाल्यास नागपूर-नागभीड अंतर कमी कालावधीत गाठात येईल. यामुळे संपर्काची गती वाढणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे