शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाच्या २१ दिवसांनंतरही वैद्यकीय अधिकारी रुजू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर ...

जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले. मात्र, यंत्रणा नसल्याने या उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्या बांधल्या जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी १५ दिवसांच्या आत उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अवघ्या २४ तासांतच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली. मात्र, २१ दिवस उलटूनही त्या रुग्णालयात हजर झाल्या नाहीत.

दोन दिवसांत टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर हजर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, अशा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.

परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी, या हेतूने पाच ते सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ ला आदेश पत्र काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली होती. मात्र, या डॉक्टर येण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून आहे. यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

२१ दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे आता निवेदन नाही तर सरळ हल्लाबोल, असे म्हणत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालृू, असा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.

बॉक्स

आरोग्यसेवेसाठी आर्थिक भुर्दंड

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी नियुक्ती आदेश काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाची सूत्रे सोपविण्यात आली होती; पण २१ दिवस उलटूनही त्या येथे रुजू झाल्या नाहीत. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांची कोरोनाकाळात गैरसोय होत आहे. आजार झाल्यास अकारण खासगी रुग्णालय किंवा जिवती येथील रुग्णालयात जावे लागते. यात गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

190721\img-20210719-wa0111.jpg

सिंधुताई जाधव