शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मूल उपजिल्हा रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर

By admin | Updated: June 16, 2017 00:40 IST

वातावरणात जसजसा बदल होत आहे, तसे रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. यामुळे येथील खासगीसह सरकारी

दररोज शेकडो रुग्णांची नोंदणी : अस्वच्छतेचा कळस, खाटांवर किड्यांचे साम्राज्यभोजराज गोवर्धन । लोकमत न्यूज नेटवर्कमूल : वातावरणात जसजसा बदल होत आहे, तसे रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. यामुळे येथील खासगीसह सरकारी रुग्णालयात रुग्णाची अफाट गर्दी वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने व रुग्णालयात असलेल्या अस्वच्छतेमुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासन आणि आरोग्य प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील कारभार सध्या वाऱ्यावर सुरू असून रूग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे.मूल तालुक्याची वाढती लोकसंख्या व जनतेच्या सेवेसाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहायाने अडीच कोटी रुपये खर्च करून मूल येथे वाढीव पन्नास खाटांचे श्रेणीवर्धीत भव्य आणि सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. रूग्णालयात प्रशिक्षित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यासह ४६ पदांना मंजुरी देण्यात आली. परंतु आजच्या स्थितीत येथील १९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामध्ये विशेषत: सर्जन, फिजीशियन व बधिरीकरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर या रुग्णालयात संपुर्ण पदे भरण्याचे आश्वासन तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी ५ मे २००२ दिले. परंतु अजुनही ते पुर्ण झाले नाही. या ठिकाणी १३ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. प्रभारीच्या खांद्यावर येथील उपजिल्हा रुग्णालय चालविल्या जात आहे. याकडे शासन आणि आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा. अधिसेविका वर्ग ३ चे १ पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार परिसेविका काटकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु त्या मुख्यालयी राहात नसल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे तिनतेरा वाजत आहे. रुग्णालयाने अस्वच्छतेचा कळस गाठलेला असून अनेकदा रुग्णांच्या खाटांवर किडांचे साम्राज्य पसरलेले दिसते. अधिपरिचारिका कुणाचेही ऐकण्यास तयार नाही. याकडे कुणाचेही लक्ष नाही. रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सहा. अधिसेविकेची असते. परंतु प्रभार असलेल्या काटकर या मुख्यालयी राहत नसल्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र आरोग्य प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तसेच आयुष व शालेय तपासणी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णावर उपचार केल्या जात आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात ४६ पदांना मंजुरी आहे. त्यापैकी १९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये वैद्यकीय अधीक्षक १, सर्जन १, बधिरीकरण तज्ज्ञ १, फिजिशयन १, सहा. अधिसेविका १, परिसेविका १, अधिपरिचारिका २, कारभारी १, कनिष्ठ लिपीक १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, क्ष-किरण तंत्रज्ञ १, औषधी निर्माता २, शिपाई १, बाह्यरुग्ण सेवक १, वर्णोपचारक १, शस्त्रक्रियागृह परिचर १, नेत्रचिकित्सक सहायक १ पद रिक्त आहेत. राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच गृहक्षेत्रातील मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांना ग्रहण लागले आहे. त्यामुळे त्यांनी आता तरी लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे. रुग्णांच्या बेडवर किडे असतानाही परिसेविका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून रुग्णालयात स्वच्छता राहावी यासाठी प्रयत्न करावे.- अशोक भीमनवार, रुग्णाचे मित्रउपजिल्हा रुग्णालयात नेहमीच स्वच्छता ठेवतो. रुग्णालय स्वच्छ ठेवण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. परंतु सफाई कामगारानी रुग्णालयाची स्वच्छता केली नसेल तर त्याची चौकशी करून रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सुचना देवू.- डॉ. अनिल गेडाम, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मूल.