शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 5:00 AM

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.

ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकीकडे निसर्गाच्या संकटाचा सामना करताना दमछाक होत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.शेतकरी कापणी करत असताना डुकरांकडून नासाडी होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. वन विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. काही शिवारात पंचनाम्याची कामे सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार होईल. त्यानंतर शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी बराच कालवधी लागण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांमध्ये दहशतजंगल परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच मोठ्या प्रमाणात संचार आहे. वन्यप्राण्यांनी शेतकरी तसेच रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांवर अनेकदा प्राणघातक हल्ले केले. अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप शासनाने प्रभावी उपाययोजना केली नाही. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यातील भातशेती प्रामुख्याने जंगल भागाला लागूनच आहे. त्यामुळे शेतकºयांना जीव मुठीत घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहेत.सरपंचांशी हवा समन्वयरबी हंगामातील हरभरा पिकाचे दरवर्षीच नुकसान होते. गावस्तरावर जनजागृती करून वनविभागाने मोहीम राबविण्याची गरज आहे. काही ठिकाणी वनरक्षकांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. परंतु सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वनरक्षक व अन्य वन कर्मचाऱ्यांचा समन्वय वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी