शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षांपासून करंजी एमआयडीसी ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

करंजी एमआयडीसी सुरू करा, अन्य शेतजमिनी परत करा आक्सापूर : १९८० च्या दशकात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील सुमारे ३५ ...

करंजी एमआयडीसी सुरू करा, अन्य शेतजमिनी परत करा

आक्सापूर : १९८० च्या दशकात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील सुमारे ३५ एकर मोक्यावरची शेतजमीन औद्योगिक प्रयोजनार्थ शासनाने अधिग्रहित केली. तत्कालीन बाजारमूल्याने शेतकऱ्यांना मोबदलादेखील मिळाला. मात्र एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही करंजी एमआयडीसीच्या जागेवर एकही उद्योग उभा राहिला नाही. येथील जागा केवळ आबालवृद्धांच्या विरंगुळा आणि शतपावलीपुरती उरली आहे. यामुळे करंजी एमआयडीसीकडून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या हाताला काम द्या, अन्यथा शेतजमिनी परत करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल गोंडपिपरी तालुका उद्योगविरहित आहे. परिणामी सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या हाताला तालुक्यात कामे नाहीत. शेती आणि शेतमजुरी हा मुख्य व्यवसाय असलेल्या या तालुक्यात शेतीचा हंगाम आटोपला की येथील मंडळी रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकतात. अशावेळी मात्र लगतच्या तेलंगणा राज्याचा गोंडपिपरीकरांना मोठा आधार वाटतो. मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी तालुक्यातील मंडळी आपल्या बिऱ्हाडासह काही महिन्यांसाठी स्थलांतरित होतात. अशा कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. गतवर्षी कोरोनामुळे पुकारलेल्या लाॅकडाऊननंतर जेव्हा मजुरांचा स्वगृही परतीचा प्रवास सुरू झाला, त्यावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या या कुटुंबीयांना घर गाठेपर्यत मोठ्या यातना सोसाव्या लागल्या. याचा प्रत्यय सर्वांना आला.

बॉक्स

उद्योग नाही, केवळ वृक्षलागवड

करंजी एमआयडीसीवर उद्योग उभारणीसाठी आजपर्यंत राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही पत्रव्यवहार केला. मात्र याचा काहीएक फायदा झाला नाही. या भूखंडावर भौतिक सुविधा आणि सामाजिक वनीकरणामार्फतीने वृक्षलागवड या पलीकडे तिसरे काम झाले नाही. असे असताना राजुरा विधानसभेची निवडणूक लढताना बहुतांश उमेदवारांच्या जाहीरनाम्याचा करंजी एमआयडीसी हा विषय ठरलेलाच. एकदा निवडणुका झाल्या की पाच वर्षासाठी हा विषय दुर्लक्षित पडतो. विशेष म्हणजे, तालुक्याला लागून वर्धा, वैनगंगा आणि अंधारीसारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुका आजही उद्योगाविना विकासापासून दूर आहे.

कोट

मोठे उद्योग उभे राहू शकत नसतील तर स्थानिक महिला बचत गट, सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगारांना येथील भूखंडाचे वाटप करावे.

- समीर निमगडे,

सदस्य ग्रा.पं.करंजी.

बॉक्स

पालकमंत्र्यांनीच आता आपल्या गावाकडे लक्ष द्यावे

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार करंजी गावचे सुपुत्र आहेत. या गावाच्या मातीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार सरपंच तर भाऊ विलास वडेट्टीवार करंजी गावाचे उपसरपंच राहिले. करंजी गावाशी त्यांची नाळ आजही जुळली आहे. त्यांनीच आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

100721\img-20210708-wa0088.jpg

फोटो