शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची केविलवाणी थट्टा

By admin | Updated: November 5, 2015 01:16 IST

अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १९८२ पासून

चंद्रपूर : अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १९८२ पासून विशेष घटक योजना राबविली जात आहे. शेतीशी संबंधित बाबी या योजनेतून अनुदानावर पुरविल्या जातात. यासाठी मृद संधारण व नाबार्डच्या निकषानुसार १०० टक्के अनुदान दिले जाते. १९८२ पासून लावण्यात येणाऱ्या या निकषात आता बदल होऊन वस्तू व साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत. असे असतानाही १०० टक्के अनुदानाच्या नावाखाली अतिशय तोकडे सहाय्य केले जात आहे. त्यामुळे ही विशेष घटक योजना गरीब शेतकऱ्यांची थट्टा करणारी ठरली आहे.अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढविणाऱ्या या विशेष घटक योजनेंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण व शेतीची सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी किंवा रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहिर दुरुस्ती, पाईप लाईन, पंप संच, नवीन विहिर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार ठिबक संच, ताडपत्री या बाबींसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावे सहा हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन आहे व ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्या मर्यादेत आहे, असे आदिवासी व अनुसूचित जाती शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती असते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कृषी विकास अधिकारी हे सदस्य असतात. विशेष घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसंबंधी बाबी पुरविण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जात आहे. यासाठी मृत संधारण व नाबार्डचे निकष वापरले जात आहे. मात्र सद्यस्थितीत महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतीसंबंधी साहित्याच्या व इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदान दिले जात असले तरी प्रतक्षात ते ५० टक्केही नाही. त्यामुळे अटीनुसार ५० हजाराच्या मर्यादेत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेताना स्वत:चे लाखो रुपये लावावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाची ही योजना मागास व गरीब शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)शासनाने योजनेत बदल करावा४राज्य शासनाने सध्याची महागाई लक्षात घेता या विशेष घटक योजनेत बदल करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबत चंद्रपुरातील कृषी विभागानेही काही महिन्यापूर्वी शासनाला एक पत्र पाठवून अनुदान राशीत वाढ करण्याची मागणी केली आहे. यावर अद्याप शासनाने गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही.१०० टक्क्याच्या नावाखाली तोकडे अनुदान४सध्या महागाई वाढली आहे. राज्य शासनाकडून ज्या बाबीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते, ती बाब तेवढ्या अनुदानात पूर्णत्वास जात नाही. उदाहरणार्थ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीरीसाठी ७०,००० ते १,००००० रुपये अनुदान दिले जाते. मात्र प्रत्यक्षात विहीर बांधकामासाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाखांचा खर्च येतो. अडीच लाख रुपये स्वत:जवळचे वापरावे लागत असल्याने शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसून येत नाही.१०० टक्के अनुदान व प्रत्यक्षात खर्च४पीक संरक्षण व शेतीची सुधारित अवजारे १०,००० रुपये अनुदान मात्र खर्च एक लाखाहून अधिक४बैलजोडी किंवा रेडेजोडी ३०,००० रुपये अनुदान, मात्र खर्च १ ते दीड लाख४बैलगाडी १५,००० रू अनुदान; मात्र खर्च ७० ते ८०,००० रु.४इनवेल बोअरिंग २०,००० रू अनुदान; मात्र खर्च ४०,००० रू.४पाईप लाईन २०,००० रू अनुदान; मात्र खर्च ५०,००० रु.४पंपसंच २०,००० रू अनुदान; मात्र खर्च ५०,०००रू.४नवीन विहीर ७०,००० ते १ लाख रू अनुदान; मात्र खर्च साडेतीन लाख४शेततळे ३५,००० रू अनुदान; मात्र खर्च ७०,००० रू.४तुषार व ठिबक सिंचनसंच पुरवठा २५,००० रू अनुदान; मात्र खर्च ६०,०००