शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे, शेतीपयोगी साहित्य मिळते. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजुरा : राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे, शेतीपयोगी साहित्य मिळते. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑनलाईन कामामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी २४ मे हा शेवटचा दिवस होता. अशावेळी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजाला कृषी योजनांपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नी लक्ष घालून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.

शेतीचा खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे व शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात जात आहेत. सध्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आला आहे. रब्बी पिके हातात आली असतानाच वरुणराजा बरसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कंबर कसली आहे. पण शासकीय योजनांसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मागील काही दिवसांपासून ऑनलाईनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे कृषी योजनांचा लाभ मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच २४ मे हा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांत मोठा रोष पाहायला मिळत आहे. मुळात ऑनलाईन व्यवस्थेत तांत्रिक घोळ असतानाही याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या याच बेजबाबदारपणामुळे शेतकरी कृषी योजनांपासून वंचित राहू शकतो. शासनाने अनुदानावर मिळणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईनची तारीख वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.