शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी उपकालव्याची किंमत २ हजार २१८ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST

घनश्याम नवघडे नागभीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भेट दिलेल्या आणि नागभीड तालुक्यातून गेलेल्या ५५ किमी लांबी असलेल्या ...

घनश्याम नवघडे

नागभीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भेट दिलेल्या आणि नागभीड तालुक्यातून गेलेल्या ५५ किमी लांबी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याची किंमत २ हजार २१८ कोटींच्या घरात गेली आहे. काम कासवगतीने सुरू आहे. १२ वर्षांपासून या कालव्याचे काम सुरू असले तरी अद्याप बरेच काम शिल्लक आहे.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यास २३ जून २००६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आणि काही दिवसांतच या घोडाझरी उपकालव्याचे काम सुरू झाले. हा उपकालवा नागभीड तालुक्यातून भूमिगत स्वरूपात गेला आहे. म्हणूनच, या कालव्याचा या तालुक्याला फायदा काहीच नाही. उलटपक्षी या कालव्याच्या रूपाने मृत्यूचे दरवाजे आणि मातीचे ढिगारे या तालुक्याच्या नशिबी आले आहेत.

नागभीड तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. १२ वर्षांपूर्वी या उपकालव्याचे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, हे काम अर्धवटच आहे. नागभीड तालुक्यातून हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला असून कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी या तालुक्यात ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार करण्यात आले आहेत. शेतात मातीचे डोंगर तयार झाल्याने शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

दरम्यान, या कालव्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले असता गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. गोविंद भेंडारकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी या उपकालव्याविषयी मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर या कालव्याच्या कामाकडे मी स्वत: लक्ष घालणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने थोडी आशा निर्माण झाली आहे.

अर्धवट कालव्यामुळे अपघात घडले

एवढेच नव्हे, तर या अर्धवट कालव्याच्या रूपाने शासनाने या तालुक्यातील लोकांसाठी मृत्यूचे दरवाजे उघडून दिले आहेत. गेल्या आठ- दहा वर्षांत तालुक्यातील नवेगाव पांडव येथे ५ आणि मौशी येथे ३ अशा ८ घटनांनी हेच सिद्ध झाले आहे. असे असले तरी नागभीड तालुक्याला या कालव्याचा म्हणा किंवा प्रकल्पाचा म्हणा कोणताच फायदा नाही.

बॉक्स

उपसा जलसिंचन व्यवस्था हवी

या उपकालव्याची लांबी ५५ किमी असून १८ किलोमीटर भूमिगत स्वरूपात आहे. कालवा भूमिगत असला तरी शेती नापीक झाली आहे. या भूमिगत भागात उपसा जलसिंचनची व्यवस्था करून त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

बाॅक्स

मोबदल्याचे अनेक प्रकरणे बाकी

या उपकालव्यासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यातील बहुतेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अतिशय अल्प प्रमाणात मिळाला आहे. एवढेच नाहीतर अनेक शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता हे कार्यालय चंद्रपूर येथून गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

कोट

मुख्यमंत्र्यांनी कालव्याला भेट दिली तेव्हा मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले.या कालव्याबाबत बोलायचे झाल्यास अधिकाऱ्यांनी कंत्राटदार कंपन्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर किमती वाढवून दिल्या आहेत. हे सत्य पुढे आल्यानंतर कारवाईसुद्धा झाली आहे.

- गोविंद भेंडारकर,

संयोजक, गोसे खुर्द संघर्ष समिती .

बॉक्स