शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाविना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक

तळोधी (बा.) : बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक पॅटर्न राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यानुसार अनेक शाळांना वर्ग पाचवा जोडला आहे. मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.नव्या नियमानुसार सत्र २०१४-१५ मध्ये ज्या शाळात वर्ग ४ थीपर्यंतचे वर्ग होते व जिथे वर्ग ५ वा आणि वर्ग ७ वा सुरु होता, तिथे वर्ग ८ वा वर्ग सुरु करण्याचे शासन आदेश निर्गमित झाले. त्यानुसार ग्रामीण भागातील काही शाळांत वर्ग ५ वा व वर्ग ८ वा सुरु झाला. परंतु हायस्कूल मध्ये असलेला वर्ग ५ वा बंद करण्याचे आदेश शासनाकडून निर्गमीत न झाल्याने यापूर्वी ज्या शाळांत वर्ग ५ वा सुरु होता, तो वर्ग पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी तेथील शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वर्ग टिकविण्याचा प्रयत्न केला या कामात काही अंशी त्यांना यशही प्राप्त झालेले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील ज्या जि.प. शाळांत ४ था वर्ग होता, तिथे आज ५ वा वर्ग व दोन शिक्षक अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यापैकी एखादा शिक्षक रजेवर किंवा प्रशिक्षण घेण्याकरिता गेला तर एकच शिक्षक आणि ५ वर्ग अशी अवस्था निर्माण होणार आहे. मग एक शिक्षक ५ वर्गांना कशाप्रकारे सांभाळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार बालकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासकीय नियोजनाअभावी प्राथमिक शिक्षणाचा बट्याबोळ झाला असून शिक्षणाच्या अधिकाराच्या नियमाची एैसीएैसी होत असल्याचे दिसून येत आहे. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने असे चित्र उभे झाले आहेत तर खासगी शाळात वर्ग ५ वीमध्ये पुरेशे विद्यार्थी न मिळाल्याने वर्गातील पटसंख्या कमी आहे किंवा पूर्वीच्या वर्गाची संख्या कमी झाली आहे. परिणामी बरेचसे शिक्षक कमी होत आहे. शासनाकडून कुठलेही नियोजन न करता वर्ग ४ थी असलेल्या शाळांना वर्ग ५ वा का जोडला, हे न समजनारे कोडेच आहे.आता वर्ग ५ वी सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शाळांना नवीन शिक्षक मिळवून देण्याकरिता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत शाळेचे अर्धे किंवा संपूर्ण सत्र तर संपून जाणार नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. (वार्ताहर)