शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीचे तांडव

By admin | Updated: March 28, 2015 00:59 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्र. १५५ मध्ये गुरुवारी रात्री आग लागली. रात्रीच आग

कक्ष क्रमांक १५५ मध्ये आग : मोठी हानी टळलीदुर्गापूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्र. १५५ मध्ये गुरुवारी रात्री आग लागली. रात्रीच आग विझविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न करण्यात आल्याने मोठी हानी टळली. मात्र अद्यापही काही भागात आग धगधगत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आग लागू नये याकरिता विशेष उपाय योजना केल्या जातात. मात्र उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच कक्ष क्र. १५५ मध्ये आग लागली. सुखलेल्या पाला पाचोळा, खाली पडलेली फळे खाक झाले. यामुळे तृणभक्षी वन्यजीवाना याचा फटका बसणार आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून दिवसागणीक तापमाणात वाढ होत आहे. यामुळे वन्यजीवाच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता हिरव्या झाडांचा वन्यप्राणी आश्रय घेत आहे. अशातच जंगलाला आग लागल्याने वन्यजीवांची पळापळ सुरु झाली. या आगीमध्ये वन्यजीवांचा चारा जळून खाक झाला आहे.झाडावरील पक्षांची घरटे व त्यात असलेले त्यांचे पिलांचेही नुकसान झाले आहे. झाडावरील खाली पडलेल्या बियाही नष्ट झाल्या एकंदरीत जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमध्ये आग लागने एक गंभीर बाब आहे. व्याघ्र प्रशासन याकरिता एक ना अनेक उपाययोजना करते मात्र या उपाययोजना कमी पडत आहे. या वनामध्ये आजही काही भागात आग धगधगत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर) पर्यटनावर पडणार परिणामताडाबो अंधारी प्रकल्पातील कक्ष क्रमांक १५५ मध्ये आग लागली. यामुळे तेथील वन्यप्राणी भटकले आहे. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यही नष्ट झाले आहे. परिणामी एकमेवांवर अवलंबून असलेली येथील साखळी तुटण्याची शक्यता आहे. ताडोबा प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून आगीच्या अशा घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यटनावरही याचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जंगलातील पानवठे कोरडेताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र काही ठिकाणी पाणवठे नसल्याने जंगली प्राणी गावाकडे धाव घेतात, अशावेळी माणव वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष होण्याची भिती असते. त्यामुळे ताडोबासह अन्य जंगलातही पानवठे तयार केल्यास वन्यप्राण्यांना सोयीचे होईल.