शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज माफीबद्दल शेतकऱ्यांत संभ्रम

By admin | Updated: June 21, 2017 00:46 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

कुणाला मिळणार लाभ? : अनेक शंकानी शेतकरी हैराणलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कर्जमाफीची सवलत फक्त पीक कर्जापुरतीच ठेवण्यात आली, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.चिमूर तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा बँकेनेही तालुक्यात लाखो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. परंतु, शासनाने घातलेल्या जाचक अटीमुळे सामान्य शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपये कर्ज तातडीने देण्याच्या सूचना जिल्हा बँकांना देण्यात आल्या असल्या तरीही तालुक्यात एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळालेला नाही. चिमूर तालुक्यात धान, कापूस, सोयाबीन असे संमिश्र पिकाचे उत्पादन घेतल्या जाते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कपासीची व सोयाबीनची पेरणीही केली. परंतु, बी-बियाणे, खत औषधे आणि मजुरांना पैसे उपलब्ध झाले नाहीत तर शेतकऱ्यांना याचा फायदा काय, असा सवाल विचारला जात आहे.शासनाची कर्जमाफी आणि दहा हजाराची तातडीची कर्ज स्वरूपी मदत ही निकषात अडकली तर संपासारखे तीव्र आंदोलन करूनही हाती काय लागले, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. शासनाचे शेती निकष हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाबतीत अडचणीचे ठरणारे असून त्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.दुसरीकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत:हून कर्जमाफी नाकारण्याची गरज आहे. परंतु, चिमूर तालुक्यात अद्याप, असा एकही शेतकरी पुढे आलेला नाही. तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, मोठे क्षेत्र असणारे शेतकरीही कमी नाहीत. ते प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा कापूस, सोयाबीनचे उत्पन्न मिळवितात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळणे आवश्यक असेल तर धनदांडग्या शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे येत शासनाची कर्जमाफी नाकारणे गरजेचे आहे. मात्र सध्या शेतकरी संभ्रमात आहेत. निकषांकडे लक्षशेतकऱ्यांच्या संपाचा धसका घेत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला तर या कर्ज माफीसाठी वेळ लागला म्हणून खरीपाच्या पेरणीसाठी दहा हजार रूपये कर्जरूपी रक्कम देण्याची घोषणा शासनाने केली. त्यासाठी शासनाचे निकष, अटी काय आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना अजुनही नाही. तर जिल्हा सहकारी बँकाही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्यास नकार देत असल्याचा प्रकार सुरू आहे. यासाठी काही शेतकऱ्यांनी अटी व शर्ती आणि निकष कशाला, असे मत व्यक्त करीत आहेत. तरी पण शेतकऱ्यांनी कर्जमाफी व दहा हजार रुपये मदतीसाठी निकषाकडे लक्ष ठेवून आहेत.