शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा भार

By admin | Updated: November 4, 2015 00:53 IST

जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.

वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्याची व्यथा गोंडपिपरी : जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून गोंडपिपरी येथे पोलीस ठाणे तर धाबा व लाठी येथे उपपोलीस ठाणे हे शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम करीत आहे. मात्र येथील पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ६० हून अधिक खेडे गावांचा समावेश आहे. तालुका सीमा ही ३० किमी अंतरापर्यंत विस्तारित असल्याने तालुक्यातील भं.तळोधी येथे पोलीस चौकी स्थापण्यात आली. या चौकीअंतर्गत २० हून अधिक गावांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण केले जाते. तसेच गोंडपिपरी हद्दीत वढोली, करंजी, धामणपेठ, चेकपिपरी व गोंडपिपरी ही मोठी गावे व आसपासची किरकोळ गावे अशी अन्य ४० हून अधिक गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षकासह चार अन्य सहकारी अधिकारी व जवळपास ८० कर्मचारी असे पदे मंजूर असतानाही रिक्त पदांच्या ग्रहणामुळे आज एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक असे दोन अधिकारी व अन्य २० कर्मचारी येथे कर्तव्य पार पाडत आहेत. या व्यक्तीरिक्त कर्मचारी टपाल, कोर्ट कामकाज, उपविभागीय अधिकारी कार्यालय व अन्य कामकाज निमित्ताने कर्मचारी बाहेर असतात.जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच तालुक्याच्या सीमावर्ती भागातून काही परप्रांतीय दारू तस्करीचा गोरखधंदा चालवत आहेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस विभागाला हतबल झाल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही येथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. परिसरातील जनसामान्य, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, सरपंच, तंमुस समित्या यांनी पोलिसांना अपेक्षित सहकार्य करून दारूबंदीच्या सक्त अंमलबजावणीस सहकार्य करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.तसेच जनसामान्यांच्या संरक्षणासाठी लढणारा पोलीस हा समाजाचा मित्र असून समाजातील वाईट वृत्ती विरोात पोलिसांना सहकार्य करून नागरिकांनी उपकृत करावे, असेही त्यांनी म्हटले. (वार्ताहर)