शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासांअभावी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या रात्रकालीन बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ...

राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा चार आगार आहेत. कोरोनामुळे सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र राज्य शासनाने निर्बंध हटविल्यानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या धावत आहेत. जिल्ह्यातील चारही आगारातून पूर्वी २१० बसफेऱ्या धावायच्या. सद्यस्थितीत १०० बसफेऱ्या धावत आहेत. पूर्वी लांब पल्ल्यासाठी म्हणजे पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशा रातकालीन रातराणी बस धावायच्या. मात्र या बसला पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाने या बसफेऱ्या बंद केल्या; परंतु याच मार्गावर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असून, भरगच्च धावत आहेत. याउलट महामंडळाच्या बसमध्ये प्रवासीच मिळत नसल्याची ओरड आहे.

बॉक्स

पुणे मार्गावर गर्दी

चंद्रपूर येथून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. लॉकडाऊनमुळे या फेऱ्या बंद होत्या; मात्र आता पूर्वीप्रमाणेच धावत आहेत. सद्यस्थितीत पुणे मार्गावर गर्दी दिसून येत आहे; परंतु पूर्वीप्रमाणे अद्यापही प्रवासी मिळत नसल्याचे खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी

महामंडळाने लांब पल्ल्याच्या अंतरासाठी रातराणी बसफेऱ्या सुरू केल्या होत्या. या बस पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड येथे धावत होत्या. या बसफेऱ्यांचे तिकीट खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा कमी होते; परंतु या बसफेऱ्या काही दिवस सुरळीत चालल्या. त्यानंतर प्रवासी मिळत नसल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या.

खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची झोपण्याची व्यवस्था असते. यासोबतच टीव्ही तसेच मोफत नेट उपलब्ध केला असतो. या सुविधा बसमध्ये नसतात, त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतात.

कोट

महामंडळाच्या रात्रकालीन लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या पूर्वी धावत होत्या; मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे त्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्यातील चारही आगारातून १०० बसफेऱ्या धावत आहेत; मात्र रात्रकालीन बसफेऱ्या बंद असल्याची माहिती आगाराकडून मिळाली.