शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे रोहयो मजुरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपस्थिती

By admin | Updated: May 12, 2015 00:58 IST

चंद्रपूर : यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीची ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंद झाली

५० हजारांचा आकडा पार : जिल्हाभरात कामांना सुरूवात चंद्रपूर : यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीची ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंद झाली आहे. आतापर्यंत रोजगार हमी योजनेर्तंगत जिल्ह्यात झालेल्या कामांवर ४० हजारच्या आसपास मजुरांची संख्या असायची. मात्र यावर्षी हा आकडा पार झाला असून गत आठवड्यात तब्बल ५० हजार ४८४ मजुरांची रोहयो कामांवर उपस्थिती होती. गतवर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. तर उशीरा आलेल्या पावसामुळे दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. याचा फटका सहन करून शेतकऱ्यांनी कसेतरी पिकांची लागवड केली. मात्र पावसाने पून्हा दगा दिला. त्यामुळे हाती आलेले पीक करपून गेले. यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थीवर मात करण्यासाठी व हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना काम देण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामांना लवकर सुरूवात केली. ग्रामीण भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीणांत नैराश्य होते. मात्र रोहयो कामांमुळे आर्थिक टंचाईच्या खाईत सापडलेले शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या कामांवर जाण्यास पसंती दिली. त्यामुळे मजुरांची उपस्थिती रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात कामे केली जात असून शंभर दिवसाचे काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे गावस्तरावर विहिर बांधकाम, तलाव खोलीकरण, रस्ता काम, रोपवन अशाप्रकारची कामे रोजगार हमी योजनेतून केली जात आहेत. ग्रामपंचायत स्तर व यंत्रणेमार्फत ही कामे केली जात आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक कामेचंद्रपूर जिल्ह्यात सध्यास्थितीत रोजगार हमी योजनेर्तंगत ११६९ कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक १००१ कामे ग्राम पंचायत स्तरावर सुरू असून यंत्रणेमार्फत १६८ कामे सुरू आहेत. ग्राम पंंचायत स्तरावरील कामांवर ४८ हजार ६८१ तर यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांवर १८०३ मजुरांची उपस्थिती आहे. शेल्फवरील कामांमुळे रोजगाराचा प्रश्न मिटलाजिल्ह्यात सध्यास्थितीत ११६९ कामे सुरू असली तरी शेल्फवर ११ हजार ६१७ कामे ठेवण्यात आली आहेत. मजुरांकडून रोजगाराची मागणी झाल्यास ही कामे केव्हाही सुरू करता येणार आहेत. या कामांची ७४.३६ लाख मजुर क्षमता आहे. त्यामुळे सध्यास्थितीत कोणत्याही ग्रामीण नागरिकाला मजुरीसाठी भटकंती करण्याची गरज नाही.मजुरीप्रती असंतोष ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची लक्षणीय वाढ असली तरी मजुरीप्रति असंतोष दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोहयो मजुरीत केवळ १३ रूपयांची वाढ शासनाने केली आहे. खासगी कामांवर यापेक्षा दुप्पट मजुरी मिळत असल्याने जोखीम पत्करून करावे लागणाऱ्या रोहयो कामाची मजुरी वाढविण्याची मागणी आहे. रोजगार हमी योजनेर्तंगत जिल्ह्यात अनेक कामे सुरू आहेत. मजुराला काम देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून कोणताही मजुर कामासाठी भटकंती करू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तर व यंत्रणेमार्फत कामे सुरू आहेत. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीमुळे रोहयो कामांवर मजुरांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे. - विनोद हरकांडेउपजिल्हाधिकारी रोहयो, चंद्रपूर.