शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुसंगाने विनाशच साधेल

By admin | Updated: January 12, 2016 00:57 IST

सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, ...

स्वामी गोविंददेव महाराज : श्रीरामकथा प्रवचनमालेचे पाचवे आख्यानचंद्रपूर : सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, कारण त्याचा शेवट पतनातच होणार असल्याचा हितोपदेश आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सोमवारी केला. येथील चित्रकुट धाममध्ये चाललेल्या श्रीरामकथा मालेत पाचवे पुष्प गुंफताना स्वामीजींनी कैकयी-मंथरा प्रसंगाचे निरुपण केले. कलंकाची ज्याला काळजी असते, तोच मुळात संवेदनशील असतो. त्याचेच अंत:करण शुध्द असते. राम वनवासाचा संदर्भ देत ते म्हणाले, त्यागाला कठीण परीक्षेतून जावे लागते. आज राष्ट्र-धर्म परंपरा वाचवायलासुध्दा त्यागाचीच गरज असल्याची गरज आचार्य स्वामीजींनी प्रतिपादित केली. कथेतील पाचव्या दिवसाचे मुख्य यजमान लीलाराम उपाध्याय, राजमान सुधाकर चकनलवार, नरसिंगदास सारडा यांनी ग्रंथाची आरती केली. नागपूरहून आलेल्या अशोक करवा, गडचिरोलीचे माधोलाल शर्मा, डॉ. सुशील मुंधडा, कृषी अधिकारी देशमुख, डॉ. कुबेर कोतपल्लीवार, डॉ. विलास झुल्लरवार, कोल डिलर्स असोशिएशनचे सुरेश अग्रवाल, माहेश्वरी युवक मंडळाचे सुरेश राठी, अजय मेहता, महावीर मंत्री, रामकथा ज्ञानयज्ञ समितीच्यावतीने रोडमल गहलोत, विदर्भ माहेश्वरी सभेचे रामेश्वरलाल काबरा यांनी स्वामीजींचे विशेष आशीर्वचन घेतले. मुलांनी वेधले लक्षगिता परिवाराच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या शाळेतील २१ बालकांनी सोमवारी श्रीराम कथामालेच्या व्यासपीठावर गिता वाचन केले. त्यामुळे वातावरणात भक्ती-श्रध्देचा वेगळाच रंग भरला गेला. श्रीगणपती अथर्व शिर्ष आणि भगवत गितेतील १५ व्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. एक सूर, एक ताल असा मेळ जमल्याने वातावरण भारुन गेले. यावेळी मार्गदर्शक शिला उपाध्याय, माया उपाध्याय, सुनिता सोमानी, सरिता उपाध्याय यांनी मुलांचा उत्साह वाढविला.