शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

५०० हेक्टरवर पीक धोक्यात

By admin | Updated: October 16, 2016 00:46 IST

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई, हरणपायली, किन्ही, पळसगाव व कोर्टी या गावातील १८०० हेक्टरमधील...

शेतकऱ्यांमध्ये भीती : धानपिकांवर तुडतुडा व खोडकिडीचा प्रादुर्भावकोठारी : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई, हरणपायली, किन्ही, पळसगाव व कोर्टी या गावातील १८०० हेक्टरमधील धानपिकांवर तपकिरी तुडतुडा व खोड किडीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे ५०० हेक्टरवरील धानपीक धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.सध्या धानपिक गर्भावर आलेले आहे. अवघ्या एक महिन्यात धानाचे उत्पादन हाती येणार आहे. अशा वेळी तपकिरी तुडतुडा व खोडकिड रोगाची मोठ्या प्रमाणात पिकावर लागण झाली असून धानाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक या रोगांमुळे तणसात रुपांतरित होवून उभे पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही कीड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही व दाट रोवणी केली असेल तसेच युरीया खताचा जास्त प्रमाणात वापर केला असेल, अशा शेतात लागते. तिथेच या रोगांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. या रोगांमुळे पिकांच्या खोडातील अन्नरस शोषून भातपिकाची पाने पिवळी पडतात व पाने वाळून जातात व संपूर्ण पीक करपल्या जाते. त्यामुळे धानपिकातून लोंब बाहेर पडत नाही व बाहेर पडले तर लोंब परिपक्व होत नाही. परिणामी शेतातून केवळ तणस मिळते. सध्या या रोगामुळे धान शेतीत तणस निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला तक्रार करून प्रत्यक्ष पाहणी करुन या रोगावर प्रतिबंध करण्याच्या उपायाबाबत मार्गदर्शनाची मागणी केली. बल्लारपूर तहसीलदार विकास अहीर, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजणे, कृषी विस्तार अधिकारी सुधाकर खांडरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना घाबरू नये. योग्य उपाययोजना करण्याचे सूचविले.धान पिकावर तुडतुडा रोग पसरला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होवून शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. शासनाने पाहणी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी रमेश पिपरे यांनी केली आहे. (वार्ताहर)या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल २.२ मि.मी किंवा फिप्रोनिल ५ टक्के २० मिली किंवा थायोमिथोकझाम २५ डब्ल्यू. किंवा मॅलाथिलॉन ५० टक्के प्रवासी २० मिली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मिली यापैकी एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी केल्यास हा रोग आटोक्यात येतो. शेतकऱ्यांनी भीती न बाळगता रोगांवर उपाययोजना करावी, असे आवाहन बल्लारपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी नरेश ताजणे यांनी केले आहे.