शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षेच्या लाभार्थ्यांची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने तोंड वर काढले ...

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने तोंड वर काढले आहे. परिणामी राज्य सरकारने प्रथम संचारबंदी त्यानंतर आता लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये गरीब तसेच गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, काही लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यातील धान्य पैसे देऊन उचलल्यामुळे या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, अशा लाभार्थ्यांना पुढील म्हणजेच मे महिन्यामध्येही मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात शासनाने तसे निर्देश दिले आहे.

मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये ४७ हजार ९८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत १३ हजार ६० रुग्ण ॲक्टिव्ह आहे. अनेक रुग्णांना बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे अशीच स्थिती राज्यभरात आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम संचारबंदी लागू केली. मात्र, रुग्णसंख्या कमी होत नसल्याने आता लाॅकडाऊन लागू केला आहे. दरम्यान, गरीब कुटुंबातील व्यक्तींची वाताहात होऊ नये, त्यांना दिलासा मिळाला यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड ३५ किलो गहू तसेच तांदूळ तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ किलो गहू, तांदूळ एक महिन्यासाठी मोफत देण्याची देण्याची घोषणा केली. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी चालू महिन्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांतून पैसे देऊन धान्य विकत घेतल्यामुळे आपल्याला लाभ मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, पुरवठा विभागाने नवा आदेश काढून अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यामध्ये धान्याचा लाभ देण्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या महिन्यामध्ये लाभार्थ्यांनी धान्य उचलले नसेल तरीही पुढील महिन्यात एप्रिलचे धान्य मोफत तसेच पुढील महिन्याचे धान्य पैसे देऊन घ्यावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थी

१,३७१८७

प्राधान्य कुटुंब

२,६१,०८४

कोट

राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातील धान्य मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी या महिन्यामध्ये पैसे देऊन धान्य उचलले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यात मोफत धान्य मिळणार आहे तर ज्यांनी एप्रिल महिन्यातील धान्य उचलले नाही. अशाही लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

-भारत तुंबडे

अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, चंद्रपूर