शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:32 IST

गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प झाले आहे.

वडनेर : गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प झाले आहे.  ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने महाआॅनलाइन कंपनीशी २०११ मध्ये करार करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम प्रकल्पात एक संगणक परिचालक असे राज्यात २७ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती केली. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती असे तीन स्थरात विभागणी कारण्यात आली होती; परंतु २०१५ साली शासनाने महाआॅनलाइन कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्याने राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  राज्य संगणक परिचालक संघटनेने राज्यात अधिवेशनाच्या काळात ठिकठिकाणी आंदोलने केली. शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून त्यात ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांचाच केंद्र ाालक म्हणून समावेश करण्यात आला तसेच मासिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात सहा ते सात महिने काम करुनही मानधनाची रक्कम मिळालेली नाही. टास्क कन्फर्मेशेनची जाचक अट लावल्याने केंद्रचालकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेचे अर्ज रात्रंदिवस केंद्रचालकांनी विनामोबदला भरून दिले. टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करून निर्णयाप्रमाणे ६ हजार इतके मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळावे, संग्राममधील राहिलेले परिचालकाना आपले सरकारमध्ये सामावून घ्यावे, कपात केलेले मानधन अदा करावे, थकीत मानधन अदा करणे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. संघटनेतर्फे गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन खोमणे, उपाध्यक्ष भूषण बागुल, सचिव दुर्गेश बच्छाव, सुनील पाटील, मिलिंद खडताळे, प्रमोद बोरसे, अशपाक मन्सुरी, नरेंद्र अहिरे, जयराम सोनवणे आदीसह केंद्र चालक उपस्थित होते.टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करण्याची मागणीमासिक ६ हजार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात सहा ते सात महिने काम करूनही मानधन मिळालेले नाही. टास्क कन्फर्मेशेनची जाचक अट लावल्याने केंद्रचालकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. मालेगाव टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेले ६ हजार इतके मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळावे, संग्राममधील परिचालकांना आपले सरकारमध्ये सामावून घ्यावे, कपात केलेले मानधन अदा करावे, थकीत मानधन अदा करणे आदी मागण्यांचे निवेदन परिचालक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना सादर करण्यात आले.