शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या वणव्यात होरपळताहेत येनोली (खुर्द) गावचे नागरिक

By admin | Updated: November 3, 2015 00:25 IST

आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे.

हरिशचंद्र पाल तळोधी (बां)आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात दुष्काळ नसून पीक परिस्थिती ठीक असल्याचा निर्वाळा प्रशासकीय यंत्रणा जाहीर करून मोकळी झाली. मात्र परिस्थिती काहीशी वेगळीच आहे. कारण शासकीय यंत्रणा फक्त शहरात, मोठ्या गावात, सिमेंट रोड, काँक्रीट रोड असलेल्या गावातच पोहचतच असल्याचा प्रत्यक्ष अनुभव नागभीड तालुक्यातील येनोली (खुर्द) गावात पोहचल्यावरच लक्षात येईल. शेतीचा संपूर्ण हंगाम संपूनही या गावातील ८० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात धानाची रोवणी झालीच नाही. मात्र त्यांच्या गावापर्यंत प्रशासकीय यंत्रणेचा मागमुसही दिसत नाही. एकंदरीत येनोली (खु.) या गावातील आदिवासी नागरिक दुष्काळाच्या गर्तेत पूर्णत: होरपळून निघाले असून अनेकांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे ‘लोकमत’जवळ बोलून दाखविले.नागभीडपासून अवघ्या २५ किमी अंतरावर असलेले येनोली (खूर्द) गावाची लोकसंख्या जेमतेम २७५ एवढी आहे. या गावात परधान, गोंड, ढिवर या जातीचे ९५ टक्के लोक तर कोहळी समाजाचे फक्त पाच टक्के लोक राहतात. या गावातील जनतेचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालतो. या गावात जायला कच्चा रस्ता असून हिच प्रशासनाची मेहरबानी दिसून येते. गावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. या गावात पटवारी, ग्रामसेवक कृषी सहायक व इतरही अधिकाऱ्यांचे दर्शन होणे दुर्लभच आहे. परंतु, शेती करून प्रसंगी बाहेरगावी मजूरीसाठी जावून कोणतीही कुरकूर न करता मुकाट्याने जीवन जगणे एवढेच येथील लोकांना माहीत आहे. म्हणूनच या गावातील २५० एकर शेतजमीन असलेल्या भागाला पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ६० एकरातील मामा तलाव तसेच २५ एकराचे क्षेत्र असलेल्या झाडाची बोडी या दोन्ही तलावाकडे प्रशासनाने लक्ष न पुरविल्याने या आदिवासी, दुर्गम गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमीनीत भाताची रोवणी झालीच नाही. टाकलेले पऱ्हे पूर्णत: वाळून गेले. ६० एकरातील तलावाचे पाच वर्षापूर्वी रोहयोमधून थातूर-मातूर केलेल्या कामामुळे तलावात पाणीच नाही. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी विभागाकडे तक्रार केली. जि.प. सदस्या लीना पेंदाम व भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम समवेत कृषी अधिकारी पठाण यांनी भागाला भेट दिली. परंत, इतर अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.