शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन डौलात मात्र धान तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:48 PM

नगदी पीक म्हणून आता धान उत्पादक शेतकरीही कापूस शेतीकडे वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी या तालुक्यात धान तसेच कापसाचीही लागवड केली जात आहे.

ठळक मुद्देआंतरमशागतीच्या कामांना आला वेग धान पट्ट्यातील काही भागात रोवणी खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी काही भागात कापूस, तूर, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी अर्ध्याअधिक तालुक्यांमध्ये धान उत्पादन घेतल्या जाते. तर राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर या तालुक्यांमध्ये कापूस तसेच सोयाबीनची लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून आता धान उत्पादक शेतकरीही कापूस शेतीकडे वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी या तालुक्यात धान तसेच कापसाचीही लागवड केली जात आहे.

वरोरा तालुक्यात आजपर्यंत भुईमुगाची पेरणी केली जात नव्हती. रब्बी हंगामात कृषी विभागाने विशेष नियोजन केले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रयोग म्हणून भुईमुगाची लागवड केली. यामध्ये त्यांना चांगले उत्पादन मिळाले. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी केली. मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक असलेला पुरेसा पाऊस अद्यापही झाला नसल्याने अनेकांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. योग्यवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी आहे. मात्र यावर्षी बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीही दाखल केल्या आहे. वरोरा व भद्रावती तालुक्यांमध्ये बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अल्प पावसामुळे रोवण्या खोळंबल्या मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी पावसाची सरासरी कमी आहे. पावसाअभावी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच रोवणीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरवर्षी जुन-जुलैपर्यंत तालुक्यातील रोवणीचे काम आटोपायची. यावर्षी मात्र स्थिती चांगली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी ४५४ मिली पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती