शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बस, रेल्वे रिकाम्याच, प्रवासी घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून एस.टी.ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून एस.टी.ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी त्याचा फटका महामंडळाला बसला आहे. आता सोमवारपासून नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासी मिळत नसल्याचे चालक तसेच वाहकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यामध्ये २४५ बसेस आहेत. लाॅकडाऊनपूर्वी त्यांतील केवळ ३० ते ४० बसफेऱ्या सुरू होत्या. आता मात्र नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विभागातील चिमूर, वरोरा, चंद्रपूर, राजुरा या आगारांतून नागपूर तसेच अन्य लांब अंतराच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत असले तरी अन्य गावांतील बसेस रिकाम्याच जात आहेत.

रेल्वेलाही प्रवासी नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात बल्लारपूर रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे थांबतात. मात्र अपेक्षित प्रवासीच नाहीत. त्यामुळे रेल्वेस्थानकांवरही शुकशुकाट बघायला मिळत आहे.

बाॅक्स

एस.टी.च्या फेऱ्या - ८०

रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३,५००

धावणाऱ्या रेल्वेची संख्या - २५

बाॅक्स

चंद्रपूर-नागपूर बसला गर्दी

लाॅकडाऊननंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, बसफेऱ्याही नियमित धावत आहेत. चंद्रपुरातून नागपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चंद्रपूर-नागपूर या बसफेऱ्यांना बऱ्यापैकी प्रवासी मिळत आहे. अनेकवेळा बसमध्ये गर्दीसुद्धा होत आहे.

बाॅक्स

बऱ्यापैकी उत्पन्न

लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळतात काही प्रवासी घराबाहेर पडले आहे. त्यामुळे एस.टी.ला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. यामध्ये काही दिवसांमध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास आगारप्रमुखांना आहे.

बाॅक्स

अत्यावश्यक सेवेसाठीच प्र‌वास

कोट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील काही दिवसांपासून बाहेर जाणे टाळले. आता लाट ओसरली असल्यामुळे गावाकडे जाण्याचा विचार करीत आहोत. मात्र आताही हिंमत होत नाही.

- वसंत बल्की

चंद्रपूर

कोट

लाॅकडाऊन झाल्यापासून कुठेच गेलो नाही. आता सर्व व्यवहार सुरू झाले असून एस.टी.पण सुरू झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत योग्य काळजी घेऊन बाहेरगावाला जाण्याचा बेत आहे.

कोमल पिंपळकर

चंद्रपूर

कोट

सध्या शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे बी-बियाणे तसेच इतर साहित्य आणण्यासाठी शहरात जावे लागत आहे. कधी एस.टी.ने तर कधी ऑटो तसेच मिळेल त्या साधनाद्वारे जावे लागत आहे. आता एस.टी. नियमित सुरू झाल्यामुळे प्रवास करणे सुलभ झाले आहे.

महादेव खाडे

बल्लारपूर

कोट

दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे सर्व प्रवास बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी प्रथम आरक्षण करावे लागते. एवढे करूनही पुढील गावात सुविधा मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जाणे सध्या तरी टाळलेलेच बरे.

- प्रतीक कोडापे

चंद्रपूर