शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षांची बेलगाम पार्किंग

By admin | Updated: May 9, 2015 01:18 IST

चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहरात दररोज हजारो लोक बाहेरगावांवरून येत असतात.

रवी जवळे/मंगेश भांडेकर चंद्रपूरचंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहरात दररोज हजारो लोक बाहेरगावांवरून येत असतात. त्यामुळे शहरात आॅटोरिक्षांची संख्याही कमालीची वाढली आहे. शहरातील दोन हजार ७०० व ग्रामीण भागातील सुमारे ५०० आॅटोंचा पसारा दररोज शहरात असतो. या आॅटोंसाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. मात्र या वाहनतळांवर एकही सुविधा उपलब्ध करून देण्याचे सौजन्य महापालिकेने आजवर दाखविले नाही. दुसरीकडे आॅटोरिक्षाचालकांवर कुणाचाही वचक नाही. त्यामुळे संपूर्ण शहरच आॅटोरिक्षांचे पार्र्कींग झोन असल्यागत वाट्टेल तिथे आॅटो पार्क करून वाहतुकीचा खोळंबा केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. आॅटोरिक्षांच्या या बेलगाम पार्र्कींगला कोण वठणीवर आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपूरला महानगर पालिकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. लोकसंख्या वाढत असली तर शहराचा विस्तार म्हणावा तसा झालेला नाही. मध्यभागीच शहर एकवटले आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यांना कामानिमित्त वेळोवेळी आॅटोरिक्षांची गरज पडते. त्यामुळे आॅटोरिक्षांची संख्याही अलिकडे झपाट्याने वाढली आहे. चंद्रपुरात दोन हजार ७०० आॅटोरिक्षा आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून चंद्रपुरात दररोज सुमारे ५०० आॅटोरिक्षा येतात. या आॅटोरिक्षांसाठी महानगरपालिकेने शहरातील विविध १७ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. व्यवस्थेच्या नावाखाली केवळ एक फलक लावून महानगरपालिका प्रशासन मोकळे झाले आहे. ‘लोकमत’ने शुक्रवारी या संदर्भात आॅटोरिक्षांच्या विविध वाहनतळांना भेटी देत पाहणी केली असता वाहनतळाचा मुख्य उद्देशच मातीमोल झाल्याचे दिसून आले. आॅटोरिक्षांच्या एकाही वाहनतळावर कसलीही सुविधा नाही. किमान पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व शेडची व्यवस्था होणे अपेक्षित आहे. मात्र या मुलभुत सुविधीही पुरविण्याचे सौजन्य आजवर महापालिका प्रशासनाने दाखविले नाही. परिणामत: वाहनतळावर आॅटोरिक्षा उभे करण्याचे दायित्व आॅटोरिक्षा चालकांकडूनही दाखविले जात नाही. शहरातील काही वाहनतळावर जाऊन पाहणी केली असता कडाक्याचे ऊन असल्यामुळे सावलीचा आडोसा घेऊन वाट्टेल तिथे आॅटो उभे असलेले दिसून आले. प्रवासी मिळाले पाहिजे, यासाठी काही आॅटोचालक तर वाहनतळावर येऊन रस्त्यावरच उभे असतात. खुद्द वाहनतळांचीच ही अवस्था आहे, तिथे शहरातील इतर रस्त्यावर काय होत असेल, याची कल्पना कुणालाही येऊ शकते.शहरातील पूर्ती बाजार, जटपुरा गेट, झी सेल, आझाद बाग, सराफा लाईन यासारख्या अनेक ठिकाणी आॅटोंचे पार्र्कींग झोन नाही. तरीही वाट्टेल तिथे आॅटोरिक्षा उभे दिसतात. वाहतूक पोलिसांचे वाहन येताच आॅटोचालक तिथून पसार होतात. वाहतूक शाखेचे वाहन पुढे गेले की पुन्हा तीच स्थिती. यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा नेहमीच खोळंबा दिसतो. आॅटोरिक्षामधील प्रवासी एखाद्या दुकानात गेला असेल तर त्याची वाट पाहत आॅटोरिक्षा दुकानापुढेच थांबून असतो. आॅटोरिक्षाचालकाच्या या मनमानीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.