शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST

चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र ...

चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र पाणी बिल न भरण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. यामुळे ऐन हिवाळ्यात गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

ग्रामीण नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल असे नागरिकांना वाटत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतने पाण्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. काही गावात पाणीपुरवठा योजनेस दोन वीज मोटारपंप असल्याची माहिती आहे. मात्र यातील दोन्ही मोटारपंप बंद असल्याने गावात पाणीपुरवठा बंद असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात हातपंप आहे, मात्र ते नादुरुस्त असल्याने तिथूनही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरीतील पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. पैसाच नसल्याने मोटारपंप दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे.

बाॅक्स

गावातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली आहे. मात्र देखभाल-दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना वीज कनेक्शन नसल्याने तर काही मोटारपंप बंद असल्याने या योजनेला अखेरची घरघर लागली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.