शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:00 IST

अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

३०५ कोटींचा निधी: चंद्रपुरातील पाणी पुरवठा प्रबळ करणारचंद्रपूर : अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून इरई नदीच्या जॉकवेलपासून तर ग्राहकांच्या नळाच्या तोटीपर्यंत दुरुस्ती करुन २०२१ पर्यंत शहरातील प्रत्येक नागरिकाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. मानगरपालिकेने दिवाळीनिमित्त चंद्रपुरकरांना दिलेली ही सर्वात मोठी भेट असून भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असा विश्वास महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.अमृत योजनेसाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महानगरपालिका २५ टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. अमृत योजनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २३४ कोटी रुपये खर्च करुन शहरात सुमारे ५५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. इरई नदी ते चंद्रपूर शहरापर्यतची १७ किलोमीटरची मोठी पाईपलाईनसुद्धा बदलण्यात येणार आहे. १६ पैकी ८ पाण्याच्या टाक्या पाडून ८ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. तसेच तुकूमधील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि दाताळा इरई नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.दुसऱ्या टप्प्यात ७१ कोटी रुपये खर्च करुन धानोरा बॅरेजवरुन चंद्रपूर शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन २०४८ पर्यंतची संभाव्य ५.२६ लाख शहराची लोकसंख्या गृहित धरुन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात समप्रमाणात पाणी वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर शहराची पहिली पाणीपुरवठा योजना सन १९७६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी शहर आणि शहराची लोकसंख्या लहान होती. त्यामुळे १९८५ पासून इरई धरणातून पाण्याची उचल सुरु आहे. त्यावेळी २.१० लाख लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लाख आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार ५१ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. मात्र, ४० एमएलडी पाणीच मिळते. त्यापैकी ठिकठिकाणी असलेल्या लिकेजेसमुळे ८ एमएलडी पाण्याची गळती होते.नव्या योजनेमध्ये गळती होणार नसल्याने आठ एमएलही पाणी वाया जाणार नाही. धानोरा बॅरेजमध्ये २६ एमएम क्यूब पाणी शहरासाठी राखीव आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजना पूर्णत्वास आल्यानंतर धानोरा बॅरेजवरुन आणखी ४० एमएलडी पाण्याची उचल केली जाणार आहे. सध्या शहरातील नळ ग्राहकांची संख्या २७ हजार असून सर्वेक्षणातत निदर्शनास आलेल्या मालमत्तेनुसार भविष्यात जवळपास ७० हजार नळाचे ग्राहक होतील, अशी अपेक्षा आहे. हे सर्व गृहित धारुनच अमृत योजना तयार करण्यात आल्याचे आयुक्त काकडे यांनी सांगितले.दुसरी महत्वाची बाब म्हणजे या योजनेचे काम सुरु करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते फूटणार आहेत. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी योजनेमध्ये निधीचा समावेश करण्यात आल्याचेही काकडे यांनी सांगितले.सध्याची पाणीपुरवठा योजना अत्यंत तोकडी आहे. प्रत्येक भागात पाईपलाईन नसल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे पाणीपुरवठासंबंधी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र, ही योजना अंमलात आल्यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी महानगरपालिका प्रशासनाने दिलेली ही मोठी भेट असल्याचे काकडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपमहापौर वसंत देशमुख, उपायुक्त डॉ. विजय इंगोले, शहर अभियंता महेश बारई, नगरसेवक संदीप आवारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)