शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अन् शेतकरी कर्मचाऱ्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावला

By admin | Updated: November 7, 2015 00:40 IST

गडचांदूर येथील एका शेतकऱ्याचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीजजोडणी खंडित करायला गेलेल्या वीजतंत्रीच्या मागे शेतकरी कुऱ्हाड घेऊन धावले.

गडचांदूर येथील घटना : वीज खंडित करायला गेला होता वीज कर्मचारीगडचांदूर : गडचांदूर येथील एका शेतकऱ्याचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीजजोडणी खंडित करायला गेलेल्या वीजतंत्रीच्या मागे शेतकरी कुऱ्हाड घेऊन धावले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गडचांदुरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचेच कंबरडे मोडणारा निघाला. अत्यल्प पाऊस, सिंचनाचा अभाव, पिकांवर रोगराई यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. यात शासनानेही पिकांना अत्यल्प हमीभाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचा तगादा सुरू केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणांचा शेतकऱ्यांना वैताग आला असून याचेच पडसाद या घटनेत उमटल्याचे बोलले जात आहे.अशोक निळकंठ एकरे असे सदर शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे घराचे वीज बिल थकीत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून अनेक नोटीस दिल्यानंतरही वीज बिल न भरल्यामुळे कारवाई करायची म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ गडचांदूरचे कनिष्ठ वीज तंत्रज्ञ विनोद कुकडे यांनी एकरे यांचे घर गाठले. सुरुवातीला विजेच्या खांबावरून एकरे यांचा वीज पुरवठा खंडित केला. घरचे मीटर काढायला गेल्यानंतर अशोक एकरे यांनी बिल भरण्यासाठी पुन्हा मुदत मागितली. तरीसुद्धा मीटर काढल्याने सदर शेतकऱ्याचा राग अनावर झाला. त्यामुळे शेतकऱ्याने चक्क कुऱ्हाड घेऊन वीज तंत्रज्ञावर हल्ला चढविला. वीज तंत्रज्ञ यामुळे भांबावून गेले व ते पळू लागले. तरीही शेतकऱ्याने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. दिवाळी ऐन तोंडावर आली असताना कापूस संकलन केंद्र सुरु झाले नाही. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे आधीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना वीज वितरण कंपनीने कारवाईचे सत्र सुरु केले आहे. सतत वीज पुरवठा खंडित होणे व शेतातील भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. अनेक तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना शून्य असल्यामुळे आधीच शेतकरी वैतागले आहे. असे असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून होत असलेली कारवाई शेतकऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. वीज वितरण कंपनीच्या विरोधात अशोक एकरे या शेतकऱ्याने घेतलेल्या पवित्र्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. वीज तंत्रज्ञ विनोद कुकडे यांच्या तक्रारीवरून अशोक एकरे यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)