शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अजय सरकार म्हणतो, मला हत्येच्या आरोपात गोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST

चंद्रपूर : ३० सप्टेंबर २०२० रोजी घडलेल्या चंद्रपुरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने ...

चंद्रपूर : ३० सप्टेंबर २०२० रोजी घडलेल्या चंद्रपुरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने तीन आरोपींना जामीन दिला. मुख्य आरोपी अद्यापही अटकेत आहे. या प्रकरणात राजकीय दबावातून आपल्याला गोवण्यात आले आहे. पोलीस खासगीतही हेच सांगत आहेत. हत्येशी काहीएक संबंध नसताना मला का गोवण्यात आले, असा सवाल उपस्थित करून मला न्याय हवा, अशी मागणी मनोज अधिकारी प्रकरणातील आरोपी व नगरसेवक अजय सरकार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

मनोज अधिकारीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला धोका आहे, असे सांगून सुरक्षेच्या नावाखाली घरून नेले. यानंतर याप्रकरणात आरोपी म्हणून गोवण्यासाठी जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात मोबाइलचे काॅल रेकाॅर्ड मिळविले. यामध्ये हत्या झाली त्या ठिकाणी माझे कुठेलेही लोकेशन आढळून आले नाही. दरम्यान, पद्मापूर, गांधी चौक, निवासस्थान हे माझे लोकेशन मिळाले. घटनेच्या वेळी रवींद्र बैरागी आणि मनोज अधिकारी यांच्या मोबाइलचे लोकेशन एकाच ठिकाणी दाखविल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. जामिनावर न्यायालयातून सुटका झालेल्या एकाही आरोपीचे लोकेशन घटनास्थळी मिळाले नाही, ही बाबही यावेळी अजय सरकार यांनी सांगितली. न्यायालयातून सुटका झाल्यानंतर पोलीस आपल्याला या प्रकरणाशी तुझा काहीएक संबंध नसल्याचे सांगतानाच आमच्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगत होते. ही वस्तुस्थिती पोलिसांना माहिती असतानाही या प्रकरणात जाणिवपूर्वक गोवण्यात आले असल्याचा गंभीर आरोपही यावेळी अजय सरकारने केला.

तडिपारीची नोटीस

जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याबाबत नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. याचे उत्तर वकिलामार्फत दिले आहे. तत्पूर्वी पोलिसांनी जीवाला धोका असल्याचे कारण सांगून दोन महिन्यांसाठी चंद्रपूर सोडण्याचा सल्ला दिला होता. माझ्या जीवाला धोका आहे, तर पोलिसांनी मला सुरक्षा प्रदान करणे गरजेचे आहे; मात्र ते मला शहर सोडायला सांगत आहे. यावरून सुरक्षा करण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते, असा आरोपीही यावेळी अजय सरकारने केला.