शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्याचे विद्यार्थी घडविणार आदर्श गाव

By admin | Updated: February 14, 2016 01:10 IST

भारतातील बहुसंख्य युवापिढी खेड्यांमध्ये वसलेली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.

वतन लोणे घोडपेठ भारतातील बहुसंख्य युवापिढी खेड्यांमध्ये वसलेली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पनेतून प्रेरणा घेवून समाजकार्य विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भद्रावती तालुक्यातील गोरजा हे गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. आगामी काळामध्ये गोरजा या गावाला आदर्श रूप देण्यासाठी हे विद्यार्थी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीच्यावतीने गोरजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामीण समाजकार्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.अंदाजे ७५० लोकसंख्येचे गोरजा हे गाव चंद्रपूर-नागपूर महामार्गापासून चार किलोमीटर आतमध्ये आहे. देशात एकीकडे बुलेट ट्रेन धावत असताना या गावामध्ये अद्याप महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाची बस पोहोचली नाही. ९० टक्के शेतकरी कुटुंबसंख्या असलेल्या या गावातील नागरिकांना आजही आरोग्य, वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांनाच सामोरे जावे लागत आहे.शासनदरबारीही उपेक्षित असलेल्या गोरजा या गावाला समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि आठ दिवसीय निवासी ग्रामीण समाजकार्य शिबिराचे आयोजन केले. त्यामुळे नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्व गोरजावासीयांनी शिबिरार्थींचे स्वागत केले तसेच सहकार्यही केले.गोरजा येथे सध्या महिला बचत गट, पुरूष बचत गट, भजनमंडळ, गुरूदेव सेवा मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळ, क्रीडा मंडळ, तंटामुक्त समिती यांसारख्या शासकीय व खासगी अशा एकूण दोन डझनांपेक्षाही जास्त समित्या आहेत. या शासकिय, निमशासकीय व खासगी समित्यांना कार्यरत करून व त्यांच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विकासात्मक विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात योग्य समन्वय साधून व लोकांच्या सहभागातून गावाची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व राजकिय उन्नती करण्यासाठी विद्यार्थ्यांतर्फे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात योग्य समन्वय साधून कृती आराखड्यानुसार गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे.सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. ममता ठाकूरवार, प्रा. सुभाष गिरडे, प्रा. किरणकुमार मनुरे हे या समितीचे समन्वयक असणार आहेत.यावेळी प्रबोधनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. शिबिरार्थींच्या प्रयत्नाने येणा-या काळात गोरजा हे आदर्श गाव बनेल, असा आशावाद नागरिकांनीही व्यक्त केला आहे.