शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी उप कालव्यासाठी लागली ४०५ हेक्टर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST

नागभीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसे खुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उप कालव्याची पाहणी केल्यानंतर हा उप कालवा चांगलाच ...

नागभीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसे खुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उप कालव्याची पाहणी केल्यानंतर हा उप कालवा चांगलाच चर्चेत आला आहे. आता या उप कालव्याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. या कालव्यासाठी ४०५.६३ हेक्टर जमीन आवश्यक होती. आतापर्यंत ३९४.२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.

या घोडाझरी उप कालव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना सिंचन होणार आहे.

यात नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल व सावली या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमधील एकूण ११९ गावांमधील २९०६१ हेक्टर जमीन सिंचित करण्याचे उद्दिष्ट असले तरी आतापर्यंत एक दोन तालुक्यांचा अपवाद वगळता अद्याप बाकी तालुके सिंचनापासून कोसो दूर आहेत. भविष्यात कालवा पूर्णही झाला तरी नागभीड तालुका या कालव्याच्या सिंचनापासून कायम वंचित राहणार आहे. कारण नागभीड तालुक्यातून गेलेला हा कालवा पूर्णतः भूमिगत आहे. जोपर्यंत या कालव्यावर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत नागभीड तालुक्याला या कालव्यापासून सिंचन शक्य नाही, हे वास्तव आहे.

या कालव्याकरिता ४०५.६३ हेक्टर जमीन आवश्यक होती. आतापर्यंत ३९४.२९ हेक्टर जमीन शासनाकडून संपादित करण्यात आली आहे. यावर ४६.५५ कोटी रूपये खर्च झाला असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

बाॅक्स

अनेक शेतकरी अद्यापही मोबदल्यापासून वंचित

शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. जमीन संपादित करतेवेळी शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती न देता सह्या अंगठे घेण्यात आल्याचा आरोप आजही शेतकरी करीत आहेत. संपादित जमिनीचा अनेकांना अतिशय अल्प मोबदला देण्यात आला आहे. वाढीव दर मिळावा म्हणून काही शेतकरी पाठपुरावा करीत आहे. मात्र संबंधित विभाग दखल घेत नसल्याचे नागभीड तालुक्यातील प्रभावग्रस्त असलेल्या मिंथूर, नवेगाव पांडव येथील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बाॅक्स

अशीही दिशाभूल

कालव्यासाठी जमीन संपादित करतेवेळी गोसे खुर्दच्या आणि बांधकाम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भूमिगत कालव्याचा दर शंभर मीटरवर एक खुला दरवाजा ठेवण्यात येईल. त्यातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल. बांधकाम करताना याच पद्धतीने काम करण्यात आले. मात्र काम झाल्यानंतर हेच खुले दरवाजे बंद करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.