शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या कोट्यातून ४० हजार बालकांना प्रवेश

By admin | Updated: March 26, 2017 00:27 IST

आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात यावे, यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा २००९ नूसार ...

पहिली सोडत : अनेकांना प्रवेशासंबंधी संदेशच नाहीपरिमल डोहणे चंद्रपूरआर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात यावे, यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा २००९ नूसार नामांकीत शाळेमधील २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी सन २०१७-२०१८ च्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकीया राबविण्यात आली. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आठ मार्चला पहिली सोडत काढण्यात आली. या सोडतीद्वारे महाराष्ट्रातील नामांकीत शाळेमध्ये ४२ हजार ४३७ मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरीत जागाच्या प्रवेशासाठी दुसरी व तिसरी सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ नूसार आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकीत शाळेत मोफत शिक्षण देण्यात येते. सदर कायद्याची अंमलबजावणी २०१२ ला संपूर्ण राज्यभर राबविण्यात आली. शिक्षण विभागाने सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रकीयेसाठी महाराष्ट्रातील आठ हजार २६३ शाळांची निवड केली. त्या आरटीईच्या २५ टक्के कोट्यानुसार एक लाख २० हजार ४१८ बालकांना प्रवेश द्यायचा आहे. या जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील एक लाख ४३ हजार ७५९ बालकांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. त्या प्रवेशासाठी ८ मार्चला सोडत काढण्यात आली. व त्यानूसार विद्यार्थ्याना २० मार्चपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा होता. याबाबतचा संदेश शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा पालकांच्या भ्रमणध्वनीवरती पाठविला. त्यानूसार महाराष्ट्रातील ४२ हजार ४३७ बालकांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यामध्ये पूणे जिल्ह्यात सात हजार १७, नागपूर जिल्ह्यात तीन हजार ४७४, ठाणे जिल्ह्यात तीन हजार ४०६, नाशिक दोन हजार ७९५, अहमदनगर दोन हजार २९१, तर सिंधूदुर्गमध्ये ८१, नंदुरबार १०५, हिंगोली १३३, गडचिरोली २९१, चंद्रपूर जिल्ह्यात ५४०, मुंबई एक हजार ९४७, कोल्हापूर ४९५ बालकांनी प्रवेश घेतला आहे.कागदपत्रांअभावी अनेकजण प्रवेशापासून वंचितआरटीई प्रवेशासाठी रहिवासी वास्तव्याचा पुरावा, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, टेलीफोन बिल, घटटॉक्स पावती, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा, जात प्रमाणपत्र अशाप्रकारचे अनेक कागदपत्राची आवश्यक्ता आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे व त्याचा पालकांचे आधारकार्ड तसेच कागदपत्र नसल्याने प्रवेशापासून वंचीत आहेत. पालकांमध्ये संभ्रमसोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांवर भ्रमणध्वनी क्रमांकवर प्रवेश घेण्यासंबंधी शिक्षण विभागाकडून संदेश येणार होता. मात्र अनेकांना संदेशच आला नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे आपल्या पाल्याची निवड झाली की, नाही असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे.