शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जखमी विद्यार्थ्याचा उपचाराविना ३६ तास प्रवास

By admin | Updated: November 2, 2015 00:54 IST

जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) येथून जवाहर नवोदय विद्यालय बुंदी (राजस्थान) ..

पालकांत संताप : बुंदीतील जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रतापतळोधी (बा) : जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) येथून जवाहर नवोदय विद्यालय बुंदी (राजस्थान) येथे स्थानांतरित केलेला वर्ग ९ चा विद्यार्थी झाडावरून पडल्याने जखमी झाला. याबाबत विद्यालयाने पालकांना तर कळविले नाहीच; त्या विद्यार्थ्यावर उपचारही केला नाही. त्याला तशाच जखमी अवस्थेत तळोधीकडे रवाना केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अमन रवींद्र ढोबळे मु. मांगली ता. भद्रावती जि. चंद्रपूर असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. अमन झाडावरून पडून त्याचा उजवा पाय व डाव्या हाताचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राजस्थान प्रांतातील बुंदी येथे चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा) येथील वर्ग ९ मध्ये शिकणाऱ्या मुलांचे प्राचार्यानी परस्पर स्थानांतर केले. सदर विद्यार्थी जुलै महिन्यात राजस्थानला गेला. परंतु त्याच्याविषयी पालकांना कोणतीच माहिती प्राचार्यांनी कळविली नाही. अशातच ३० आॅक्टोबरला अमन रविंद्र ढोबळे हा आवळ्याच्या झाडावरून पडून त्याच्या उजव्या मांडीचे हाड तुटले. तसेच डाव्या खांद्यालाही जबर दुखापत झाली. परंतु प्रशासनाने पालकाला याबाबत कळविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्याच्यावर उपचारही केला नाही. अमनला रेल्वेमध्ये बसवून तळोधीकडे रवाना केले. त्यानंतर पालकांना भ्रमणध्वनीवरून आपला मुलगा गंभीर जखमी असून आपण खासगी वाहन करून नागपूरला या, असा निरोप दिला. हा सर्व प्रकार घडूनही तळोधी येथील नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. केवळ मुक्याबहिऱ्याची भूमिका घेऊन आपणाला यातले काहीच माहीत नाही. याबाबत बुंदीच्या प्राचार्यानी काही कळविले नाही, असे सांगून हात वर केले. विशेष म्हणजे, तळोधी विद्यालयाचाच विद्यार्थी जखमी अवस्थेत विद्यालयातील रस्त्यावर आणून टाकल्यानंतरही त्याला गाडीतून उतरविण्याकरिता विद्यालयाचे कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे बुंदीपासून तळोधी (बा) पर्यंत त्याला उचलणे, गाडीत ठेवणे, खाली उतरविणे, त्याची देखरेख करणे ही सर्व कामे त्याच्यासोबत असणाऱ्या १४-१५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनीच केली. नागपूरवरून अशा प्रकारचा गंभीर विद्यार्थी खासगी बसने तळोधीला आणला. परंतु सदर बसमध्ये गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. त्याला वेगळे रुग्णवाहिकेत पाठविण्यात आले नाही. विशेष म्हणजे, या बसचालकाने मोहाळी (नागभीड) जवळ एकदम ब्रेक दाबल्याने बसमधील काही प्रवाशीसुद्धा जखमी झाले आहे. यात जखमी विद्यार्थ्याला किती त्रास झाला असेल, याची जाणीव येते. सदर बसमध्ये जखमी विद्यार्थ्यासह ३२ विद्यार्थी व जवळपास तेवढेच प्रवासी बसले होते. जवाहर नवोदय विद्यालय, बुंदीच्या प्राचार्यांनी सदर विद्यार्थ्याला आवळे तोडण्याकरिता झाडावर चढवून त्याच्याकडून आवळे तोडून घेतल्याचे विद्यार्थ्याकडून ऐकायला मिळाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे राजस्थानला स्थलांतर करताना प्राचार्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. व स्वत:च बळजबरीने विशिष्ट विद्यार्थ्याचे स्थलांतर केले. अपंग विद्यार्थ्यावरसुद्धा दया दाखविली नाही.अशा या असंवेदनशिल व माणूसकी हरविलेल्या प्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पालकांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला आहे. तसेच केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे पालकांनी लोकमतला सांगितले. ३६ तास जखमी अवस्थेत वेदनेने विव्हळणाऱ्या अमनला न्याय मिळणार का, याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. (वार्ताहर)